Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ११ डिसेंबर, २०२४
Home
/
Unlabelled
/
दिवसेंदिवस वाढणाऱ्या रासायनिक खतांना वापरावा वर अंकुश आणण्यासाठी पोशिंदाची शंभर टक्के ऑरगॅनिक खते वापरा आणि आपल्या मातीची आणि पिकाची गरज ओळखा.
दिवसेंदिवस वाढणाऱ्या रासायनिक खतांना वापरावा वर अंकुश आणण्यासाठी पोशिंदाची शंभर टक्के ऑरगॅनिक खते वापरा आणि आपल्या मातीची आणि पिकाची गरज ओळखा.
जमिनीची सुपिकता वाढण्यासाठी योजना राबविण्याची आवश्यता
शासकीय कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी संघाची मागणी
देशातील शेतजमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी हिरवळीच्या खताचे बियाणे १०० टक्के अनुदानाने उपलब्ध करून देण्याची योजना राबविण्यात यावी,अशी मागणी राज्यातील शासकीय कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी संघाचे अॅड.प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली येथे संबंधित विभागाचे आयुक्त चंद्रमोहन यांची भेट घेवून करण्यात आली.यावेळी नाशिक येथील कृषीभूषण उत्तमराव ठोंबरे,तहऱ्हाडी (ता.शिरपूर) येथील कृषीभूषण सुदाम करके उपस्थित होते.
जमिनीत सतत पिके घेणे,सेंद्रिय खतांचा वापर कमी होणे यामुळे जमिनीचा सेंद्रिय कर्ब अत्यंत कमी झालेला आहे.जमिनीचा सामू वाढलेला आहे.यामुळे जमीन कडक होऊन सुपिकता कमी झालेली आहे.जमिनीतून पाहिजे ते उत्पादन येत नाही. उत्पादन
खर्च वाढत होत असून सेंद्रिय खतांचा वापर कमी असला तर सेंद्रिय कर्ब कमी होतो.सेंद्रिय कर्ब कमी झाल्यास जमिनीत जिवाणूंची संख्या कमी होते.हे जिवाणु कोणत्याही खताचे (रासायनिक व सेंद्रिय) अन्नद्रव्यात रुपांतर करतात.हे रुपांतर कमी झाले तर दिलेले रासायनिक खत पिकांना उपलब्ध न होता जमिनीत पडू न राहतात.परिणामी जमिन खराब होत असून उत्पादन कमी होत आहे. याउलट उत्पादन खर्चात भरमसाठ वाढ होत आहे. शेतजमिनीतील
सेंद्रिय कर्ब वाढविणे महत्वाचे आहे.यासाठी सर्वात महत्त्वाचे जमिनीत हिरवळीचे पीक घेऊन जमिनीत गाडणे आणि त्याला लागणारे बियाणे महाग असल्याने शेतकरी हा प्रयोग करत नाहीत.यासाठी केंद्र सरकारने २००७ ला राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना ही महत्त्वाकांक्षी योजना आणली.यात पिकांची उत्पादकता वाढविणे,शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर वाढविणे,जमिनीची सुपीकता वाढविणे हे महत्त्वाचे उद्दिष्ट आहेत.या योजनेवर आता जवळपास
दोन लाख कोटी रुपये खर्च केला जात आहे.मात्र हा सर्व खर्च पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी केला जात आहे.यात जमिनीची सुपिकता वाढविण्यासाठी कोणताही खर्च केला जात नाही.वास्तविक जमिनीची सुपीकता वाढल्याशिवाय पिकांची उत्पादकता वाढविणे शक्य नाही.म्हणून केंद्र सरकारने राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना अंतर्गत जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी हिरवळीच्या खाताचा वापर करावा तसेच आपल्या खतात रासायनिक खतांचा वापर कमी करून पोशिंदाचे ऑरगॅनिक फर्टीलायझर वापरा जेणेकरून येणाऱ्या काळात आपली जमिनीची गुणवत्ता टिकून राहील.यासाठी सर्व शेतकरी बांधवांनी रासायनिक खतांचा वापर कमी करून पोशिंदाची दर्जेदार ऑरगॅनिक खते वापरणे काळाची गरज आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा