Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, ४ मे, २०२०

सामाजिक वनीकरण चे झाडे घेत आहे अखेरचा श्वास.



प्रतिनिधी चोपडा तालुका येथील लासुर ते सत्रासेन रोड च्या बाजुला लावलेली झाडे घेत आहे अखेरचा श्वास..

राज्य सरकारच्या चालु असलेल्या झाडे लावा झाडे जगवा या महत्वाकांक्षी योजनेचे तीन तेरा वाजल्याचे चिञ दिसत आहे.वाढत्या तापमान समोर झाडांची अवस्था खुप बेकार झाली आहे.लावलेल्या झाडांना पाणी हे अपुरे पडत आहे तसेच झाडांची देखभाल करण्यासाठी रोजगार सेवक असुन ते सुद्धा झाडे जगवण्यात अपुरे पडताना दिसत आहे.

पाहीजे तेवढ्या प्रमाणात लावलेल्या झाडांची काळजी घेतल्या जात नाही आहे त्यामुळे झाडांची संख्या ही दिवसागणिक कमी होत असल्याचे चिञ स्पष्ट आहे.सदर झाडे जगवण्यासाठी राज्य सरकारच्या पैसा व्यर्थ खर्च होताना दिसतो तसेच वाढलेल्या तापमानचा फटका बसत आहे 

तसेच सामाजिक वनीकरण विभागाचे दुर्लक्ष होत आहे दिवसागणिक जेवढे पाणी झाडांना मिळणे अपेक्षित आहे तेवढे मिळत नसल्याने ही झाडे कोमेजून अखेरचा श्वास घेत आहे यावर प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे तसेच वेळेस या वर उपाय योजना न केल्यास संपुर्ण झाडे ही नष्ट होईल अशी परिस्थिती समोर दिसत आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध