Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ४ मे, २०२०
सामाजिक वनीकरण चे झाडे घेत आहे अखेरचा श्वास.
प्रतिनिधी चोपडा तालुका येथील लासुर ते सत्रासेन रोड च्या बाजुला लावलेली झाडे घेत आहे अखेरचा श्वास..
राज्य सरकारच्या चालु असलेल्या झाडे लावा झाडे जगवा या महत्वाकांक्षी योजनेचे तीन तेरा वाजल्याचे चिञ दिसत आहे.वाढत्या तापमान समोर झाडांची अवस्था खुप बेकार झाली आहे.लावलेल्या झाडांना पाणी हे अपुरे पडत आहे तसेच झाडांची देखभाल करण्यासाठी रोजगार सेवक असुन ते सुद्धा झाडे जगवण्यात अपुरे पडताना दिसत आहे.
पाहीजे तेवढ्या प्रमाणात लावलेल्या झाडांची काळजी घेतल्या जात नाही आहे त्यामुळे झाडांची संख्या ही दिवसागणिक कमी होत असल्याचे चिञ स्पष्ट आहे.सदर झाडे जगवण्यासाठी राज्य सरकारच्या पैसा व्यर्थ खर्च होताना दिसतो तसेच वाढलेल्या तापमानचा फटका बसत आहे
तसेच सामाजिक वनीकरण विभागाचे दुर्लक्ष होत आहे दिवसागणिक जेवढे पाणी झाडांना मिळणे अपेक्षित आहे तेवढे मिळत नसल्याने ही झाडे कोमेजून अखेरचा श्वास घेत आहे यावर प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे तसेच वेळेस या वर उपाय योजना न केल्यास संपुर्ण झाडे ही नष्ट होईल अशी परिस्थिती समोर दिसत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा