Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ६ सप्टेंबर, २०२०
विविध मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभेचे एसडीओ यांना निवेदन...!
खामगाव प्रतिनिधी:शेतकरी, शेतमजूर, कंत्राटी कर्मचारी, कामगार,किरकोळ व्यापारी, आदिवासी महिला व विविध विद्यार्थ्यांच्या मूलभूत प्रश्नांनबाबत आज अखिल भारतीय किसान सभेकडून प्रंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.
शेतकरी, शेतमजूर, कंत्राटी कर्मचारी, कामगार, किरकोळ व्यापारी, आदिवासी महिला व विविध विद्यार्थ्यांच्या मूलभूत प्रश्नांनी गंभीर रूप धारण केले आहे.
देशातील ही बहुसंख्य जनता सरकार दरबारी आपला असंतोष प्रकट करते आहे. त्यावेळी धर्मभावना आणि राष्ट्रवादाची अफू पाजत जनतेला संभ्रमित करण्याचं काम भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून करीत आहे. बहुसंख्य अशा श्रमिक वर्गाला बेदखल करीत भांडवलदारांना पूरक धोरणे हे सरकार राबवित असून वर्णव्यवस्था निर्माणाचे कार्य अत्यंत गतिमान झाले आहे हे सरकारच्या आजवरच्या कार्यकाळ यावरून हे स्पष्ट दिसत आहे.सरकारचे ह्या भूमिकेचा लालबावटा संयुक्त कृती समितीच्या वतीने तीव्र निषेध केला. सिंचनाची दुरवस्था शेती संसाधनाची भाववाढ आणि शेतमालाच्या भावाची असुरक्षितता यामुळे शेतकरी प्रचंड संकटात सापडला आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा