Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २८ फेब्रुवारी, २०२१
Home
/
Unlabelled
/
नवीन घर बांधण्यासाठी ग्रामपंचायतीची परवानगी पुरेशी, फडणवीस सरकारचा जाचक निर्णय बदलला
नवीन घर बांधण्यासाठी ग्रामपंचायतीची परवानगी पुरेशी, फडणवीस सरकारचा जाचक निर्णय बदलला
नवीन घर बांधण्यासाठी जिल्हा परिषद स्तरावरील नगररचना अधिकाऱयाची परवानगी आणायला लावणारा सर्वसामान्यांसाठी जाचक ठरणारा निर्णय महाविकास आघाडी सरकारने बदलला आहे.
त्यानुसार आता नवीन घर बांधायचे असल्यास परवानगीचे अधिकार पुन्हा एकदा ग्रामपंचायतीकडे देण्यात आले आहेत. याविषयीची माहिती महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिल.
फडणवीस सरकारच्या काळात गावात घर बांधायचे असेल तर केवळ ग्रामपंचायतीची नव्हे तर पंचायत किंवा जिल्हा परिषद स्तरावरील नगररचना अधिकाऱयाची परवानगी बंधनकारक राहणार असल्याची आदेश जारी करण्यात आला होता. मात्र हा निर्णय आता बदलण्यात आला असून घरबांधणी परवानगीचे अधिकार पुन्हा एकदा ग्रामपंचायतीकडे देण्यात आले आहेत.
गावा गावात बांधकाम परवानगीसाठीही नागरिकांना अडचणी येत होत्या. यामध्ये नागरिकांचा वेळ व पैसा खर्च होईल तसंच, बांधकाम परवानगीचे सुलभीकरण न होता केंद्रीकरण होण्याचा धोका आहे, असंही गाऱहाण अनेकांनी सरकारकडे मांडले होते.
या सर्वांचा विचार करूनच महाविकास आघाडीनं हा निर्णय बदलण्यात आल्याचे अब्दुल सत्तार यांनी सांगितले.
आपली प्रतिक्रिया द्या
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा