Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
बुधवार, २६ जानेवारी, २०२२
Home
/
Unlabelled
/
कत्तलीच्या उद्देशाने जाणाऱ्या 12 गायीची नागरिकांनी केली सुटका..! हाडाखेड आरटीओ, सांगवी पोलीस हे नेमकं करतात काय ?
कत्तलीच्या उद्देशाने जाणाऱ्या 12 गायीची नागरिकांनी केली सुटका..! हाडाखेड आरटीओ, सांगवी पोलीस हे नेमकं करतात काय ?
तरुण गर्जना वृत्तसेवा शिरपूर प्रतिनिधी
शिरपूर : दि .२६ रोजी खंबाळे येथे अवैध मार्गाने कत्तलीसाठी जाणाऱ्या एक आयशर गाडीला नागरीकांनी थांबवून १२ गायींची सुखरुप सुटका केली.त्यानंतर सदर गायी व गाडी सांगवी पोलीसांत जमा करुन गायी गोशाळेत पाठविण्यात आल्यात.खरे पाहता राजस्थान,मध्य प्रदेश या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात कत्तलीच्या उद्देशाने गुरे,ढोरे व गायी आणले जातात.या रस्त्याला सर्व प्रथम सांगवी पोलीस स्टेशन महामार्गाला लागूनच आहे.
त्यांची महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येक वाहनावर करडी नजर असते.अत्यंत दक्षपणे प्रत्येक गाडी थांबविली जाते. तपासली जाते आणि मग सोडली जाते. या नंतर पुढे हाडाखेड येथे आरटीओ चेकपोस्ट आहे.या चेकपोस्टवर गाडीची सर्व कागदपत्र ,गाडीत असलेला माल वजन गाडीची उंची या सर्व गोष्टी तपासल्या जातात.मग असे असतांना या ठिकाणाहून अवैध गुरे ढोर व गायींची वाहतूक करणारे वाहन कसे पास होतात ? या प्रश्नाची उत्तर सर्वसामान्य जनतेला माहित आहे.
खरे पाहता या ठिकाणाहून कोणतीही अवैध वाहतूक करणारे वाहन तेथून पुढे जावूच शकत नाही.वाहन तपासणीचे सर्व अधिकार असलेले आरटीओ पथक रात्रंदिवस तेथे बसलेले असतात.मग हे तेथे बसून नेमके करतात काय ? तर दे दो हमको चंदा..!;चलने दो आपका गोरख धंदा ! असाच यांचा प्रकार आहे.प्रत्येक वेळेला अवैधमार्गाने वाहतूक होणाऱ्या गुरे, ढोरे व गायींची वाहतूक करणारे वाहने हे नागरिकच कसे काय पकडतात याचे कोडे पोलीसांना पडलेले आहे.
अत्यंत बारकाईने तपासणी करून देखील पोलीसांच्या हातून व आरटीओच्या हातून ही वाहने सुटतात तरी कशी व नेमके नागरिक त्यांना पकडतात कसे.मग असेही वाटू लागते की,हा सर्व खेळ पडद्या मागील तर नाही ना ? असे इतर नागरिकांना वाटू लागले आहे.चिरीमीरी घेवून पोलीस व आरटीओ या गाड्या सोडतात व आपल्याच हस्तकाला सांगून त्या पुढे अडवल्या जातात आणि पुन्हा पोलीस स्टेशनला आणल्या जातात.हा झाला उत्पन्नाचा दुहेरी मार्ग ! आता नेमके हा मार्ग नेमका कुठे सुरु व कोठे बंद होतो याचा शोध आम्ही घेण्याचे ठरविले आहे. लवकरच याचा जनतेला लवकरच उलगडा होईल.
( वाचा सविस्तर पुढील अंकात )
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
पारोळ्याच्या फटाका फॅक्टरीच्या तिघा मालकांना दहा वर्षांचा कारावास १६ वर्षांपूर्वी आगीत २१ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अमळनेर सत्...
-
नंदुरबार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नंदुरबार येथून श्री जितेंद्र दामोदर पगारे (सर) नंदुरबार जिल्हा क्रीडा पुरस्कार सन २०२२-२३ पुरस्कार...
-
मुदतीत बांधणाऱ्यांना वाढीव अनुदान द्या तालुका काँग्रेसचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन अमळनेर : तालुक्यातील अनेक शासकीय घरकुल लाभार्थ्यांन...
-
शेवग्याचा मेव्हणा व खवशी च्या आरोपींना अटक अमळनेर प्रतिनिधी : धुळे जिल्हयातील फागणे येथील आपल्या शालकाची विम्याची रक्कम हडप करण्यासाठी शे...
-
तरूण गर्जना रिपोट :_ २९ मे ते २ जून सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीने बाहेर (खुल्या आकाशाखाली) जाऊ नये कारण हवामान विभाग...
-
अमळनेर:- अक्कलपाडा धरणातून पिण्यासाठी पाझरा नदीत आवर्तन सोडण्याची मागणी परिसरातील सरपंच उपसरपंच व लोकप्रतिनिधी यांनी केली आहे . यावर्षी ...
-
प्रचिती इंटरनॅशनल स्कूल कावठे (साक्री) येथील तीन शिक्षकांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्र राज्य इंग्लिश मीडियम...
-
अमळनेर : आई वडील ऊस तोडायला गेल्याने आसऱ्यासाठी ज्याच्याकडे ठेवले त्या चुलत मामानेच परित्यक्ता भाचीला तिच्या मुलीला मारण्याची धमकी देत...
-
सद्या राज्यात रासायनिक खतांच्या बेसुमार वापराने जमिनींची प्रत बिघडत चालली आहे. सेंद्रिय खतांचा वापर त्यासाठी वाढवताना पोशिंदाचा ऑरगॅनिक खताच...
-
जानेवारीत १३ ग्रामपंचायतींचे आरक्षण निघाल्याने प्रक्रिया चुकली अमळनेर प्रतिनिधी : जानेवारी महिन्यात १३ ग्रामपंचायतींचे आरक्षण निघालेले होते ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा