Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ३ फेब्रुवारी, २०२२

किसान रेल्वेचा महाराष्ट्राला सर्वात जास्त फायदा रेल्वे मंत्री ना. रावसाहेब पाटील दानवे



दिल्ली "भारतीय रेल्वे विभागाच्या मध्य रेल्वेद्वारे चालविल्या जाणाऱ्या किसान रेल्वेची च्या माध्यमातून महाराष्ट्राला सर्वात जास्त फायदा मिळालेला आहे. सोलापूर, लासूर, नाशिक, जालना, औरंगाबाद, सांगोला, भुसावळ, रावेर व सावदा यासह महाराष्ट्रातील अनेक ठिकाणाहून कृषिमाल देशातील वेगवेगळ्या ठिकाणी पाठवल्या गेला आहे." असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री श्री रावसाहेब पाटील दानवे यांनी आज केले. केंद्रीय कृषीमंत्री श्री नरेंद्रसिंह तोमर जी व केंद्रीय रेल्वे आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री श्री अश्विनी वैष्णव जी यांचे उपस्थितीत व्हिडीओ कॉन्फरंसिंग च्या माध्यमातून 'हजाराव्या किसान रेल्वेला' हिरवी झेंडा दाखवून रवाना केले. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी खासदार श्रीमती रक्षा खडसे जी, महाराष्ट्र सरकारचे मंत्री श्री गुलाबराव पाटील जी, महाराष्ट्राचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष श्री चंद्रकांतदादा पाटील जी, मध्य रेलवेचे जीएम श्री अनिल कुमार लाहोटी जी व्हिडीओ कॉन्फरंसिंग द्वारे व रेल्वेचे सर्व अधिकारी आणि शेतकरी बांधव सावदा येथून उपस्थित होते.
भारत हा कृषिप्रधान देश आहे, शेती हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे.
शेती क्षेत्रसाठीआपल्या सरकारने मोदिजींचे नेतृत्वात अनेक निर्णय आपलं सरकार घेत आहे व घेत राहिल. याचाच एक भाग म्हणून रेल्वे मंत्रालयाने देशाच्या अनेक भागातून ‘किसान रेलवे’ सुरु केल्या आहेत." याद्वारे जलदगतीने शेतकऱ्यांचा नाशवंत माल ज्या ठिकाणी बाजार भाव चांगले आहेत त्या ठिकाणी ५०% भाड्यावर पाठवविल्या जातो. मला अत्यंत आनंद होतोय की आज ही मध्य रेल्वे विभागातुन हजारावी ‘किसान रेल’  सावदा-महाराष्ट्र ते आदर्शनगर-दिल्ली येथे सुटत आहे" असे दानवे म्हणाले.  
शेतकऱ्याच्या मालाच्या हमी भावात सातत्याने वाढ करुन रिकॉर्ड खरेदी शासनाने केली आहे. शेतकऱ्याच्या खात्यावर दर वर्षी किसान सन्मान निधी चे पैसे जमा करणे. असे अनेक निर्णय या सरकारने घेतले, त्याच बरोबर स्थानिक उत्पादनांना देश पातळीवर बाजारपेठा देखिल उपलब्ध होणार आहेत.
देशातील सर्व घटकांच्या हितासाठी व जीवन सुसह्य करण्यासाठी अश्या प्रकारच्या अनेक रेल्वे सुविधा सुरु केल्या बद्दल मंत्री श्री दानवे यांनी पंतप्रधान यांचे आभार व्यक्त केले.
‘किसान रेल’ शेतकर्‍यांना त्यांच्या कृषी मालाची जलद, निर्धोक, सुरक्षित आणि किफायतशीर रीतीने कमीत कमी खर्चा मध्ये अगदी दूरच्या स्थानापर्यंत विक्री करण्याची सुविधा देते. जेणेकरून क्षेत्रातील शेतकऱ्यांचा विकास होईल व स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ मिळेल व अधिक रोजगार उपलब्ध होतील.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध