Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ३१ मार्च, २०२२
Home
/
Unlabelled
/
आपल्या स्वतःचाच सेवानिवृत्तीच्या दिवशी लाच घेताना शिरपूरच्या गटविकास अधिकाऱ्यांना अटक...
आपल्या स्वतःचाच सेवानिवृत्तीच्या दिवशी लाच घेताना शिरपूरच्या गटविकास अधिकाऱ्यांना अटक...
धुळे मधील शिरपूर तालुक्यातील बी डी ओ यांनी सेवानिवृत्तीच्या दोन तास आधीच गटविकास अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकल्याची धक्कादायक घटना घडली आहे.गटविकास अधिकारींसह सहाय्यक लेखा अधिकारीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धुळे पथकाने ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शिरपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वाय डी.शिंदे हे आज दि. ३१ मार्च रोजी सेवानिवृत्त होणार होते.याबाबत दि.१ एप्रिल रोजी0 सेवानिवृत्तीचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता.
सेवानिवृत्त कार्यक्रमाचे पत्रीका देखील वाटप झाल्या होत्या.मात्र आज दि ३१ रोजी सेवानिवृत्तीच्या दोन तास आधीच त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शिताफीने ताब्यात घेतले आहे.गटविकास अधिकारी वाय.डी. शिंदे यांच्या सांगण्यावरून सहाय्यक लेखा अधिकारी चुनीलाल देवरे या कर्मचारीला पाच हजारांची लाच स्विकारतांना रंगेहाथ ताब्यात घेतले आहे.
अर्जदार हे जिल्हा परिषदचे प्राथमिक शिक्षक असून,त्यांच्या तक्रारीवरुन आज लाचलुचपत विभागाने कारवाई केली आहे.तक्रारदार यांची पी.एफ.कर्जाची फाईल पुढे पाठविण्यासाठी गटविकास अधिकारी यांनी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केली होती.याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे विभागाने शिरपूर पंचायत समितीच्या आवारात सापळा रचून कारवाई केली आहे.दुपारी उशीरापर्यंत कारवाई सुरू आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नरडाणा / शिंदखेडा प्रतिनिधी :- धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात घरफोडीच्या वाढत्या घटनांवर नरडाणा पोलिसांनी मोठी कारवाई करत ३ आरोपी व एक...
-
संदीप अवधूत :- शासकीय दिव्यांग कर्मचाऱ्यांची संपूर्ण शारीरिक व कागदपत्रीय पडताळणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्यातील ...


राजकीय व्यक्ती ना प्रसिध्दी साठी घाई असते निवृत्ती नंतर एक दोन दिवस तरी थांबले असते कारण अधिकारी भ्रष्ट आहे की नाही ते कळले असते किंवा अधिकाऱ्याला वाचविता आले असते प्रामाणिक असते तर फुकटची पब्लिसिटी कधी कधी तोट्याची असते
उत्तर द्याहटवा