Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २४ ऑगस्ट, २०२२
प्रकाशा बॅरेजचे दरवाजे बंद होतानाच मच्छीमारांची उडाली झुबड..!
नंदुरबार प्रतिनिधी:मागील महिनाभरात अधून मधून पाऊस सुरूच आहे.यामुळे तापी नदीला पुर कायम राहिला.यात नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा व प्रकाशा बॅरेजचे दरवाजे उघडे होते. परंतु,आता ते बंद झाले असल्याने प्रकाशा बॅरेजच्या पुढे पुर ओसरला आहे.यामुळे आता मच्छीमारांची गर्दी झालेली पहावयास मिळत आहे.
सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे नंदुरबार जिल्ह्यातून वाहणाऱ्या तापी नदीवरील सारंगखेडा आणि प्रकाशा बॅरेजचे दरवाजे गत १५ दिवसांपासून उघडण्यात आले होते. प्रकाशा येथील चार दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडले गेल्याने पाणी बाहेर पडत होते.दरम्यान पाऊस कमी झाल्याने आणि हतनूर धरणातून विसर्ग बंद करण्यात आल्याने बॅरेज प्रकल्पांना दरवाजे बंद करण्याचे आदेश देण्यात आले.हे दरवाजे बंद झाल्यानंतर काही वेळात नदी पात्रात मच्छीमार बांधवांची अशी झुंबड उडाली होती
नदीपात्रात मोठ्या संख्येने मासे मिळण्याची शक्यता असल्याने एकाचवेळी अनेक जण जाळं घेत पाण्यात उतरले होते.यातून प्रकाशा पुलावरुन नदीपात्रात मच्छीमारांची शाळाच भरल्याचे दिसून आले.यातून अनेक मच्छीमारांना रोजगार देखील उपलब्ध होत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रा.महेंद्र तुळशिराम खेडकर: कला, शिक्षण आणि समाजसेवेचा त्रिवेणी संगम. कला आणि संस्कृतीच्या प्रांगणात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, जी केवळ...
-
अमळनेर (प्रतिनिधी) जीवे ठार मारण्याच्या गुन्ह्यात आरोपी चंद्रशेखर नामदेव सपकाळे (वय 33 वर्ष,रा. पुनगाव ता. चोपड़ा हल्ली मु. देवगांव ता. चोप...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा