Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ७ फेब्रुवारी, २०२३

राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाठलांचा मुलाची राजकारणात जोरदार एन्ट्री प्रतीक जयंत पाटील हे राजाराम बापू साखर कारखान्याचा निवडणुकीत विजयी



राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा मुलगा देखील राजकारणात पाऊल ठेवण्यासाठी सज्ज झाला आहे. जयंत पाटील यांचा मुलगा प्रतिक पाटील याने राजाराम बापू पाटील कारखान्याच्या संचालकपदी बिनविरोध निवडूण येत राजकारणात दमदार एन्ट्री केली आहे. राजाराम बापू पाटील कारखान्याच्या संचालकपदी निवडूण येताच प्रतिक पाटील याची राजकारणात अधिकृत एन्ट्री झाल्याचे बोलले जात आहे.
स्वर्गीय लोकनेते राजारामबापू पाटील हे वाळवा सहकारी साखर कारखान्याच्या स्थापनेवेळी संचालक होते. राजारामबापू पाटील यांच्या निधनानंतर वाळवा सहकारी साखर कारखान्याचे नामांतर राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना करण्यात आले. आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांचा राजकीय प्रवेश हा राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणुनच झाला होता. तब्बल १० वर्षे ते या साखर कारखान्याचे अध्यक्ष राहिले. आमदार जयंत पाटील यांनी नव्या पिढीला संधी देताना चिरंजीव प्रतिक पाटील यांचा राजकीय प्रवेश हा राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून केला आहे. अशी चर्चा आहे.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध