Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, १४ जून, २०२३

धुळे जिल्हा पोलीस प्रमुखांची लोकप्रियता अर्थातच कार्यपद्धती नेमकी कुणाला खटकत आहे ?



धुळे जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था साभांळताना काही निर्णय हे कठोरपणे घ्यावेच लागतात.याचा प्रत्यय धुळे जिल्ह्यातील पोलिस प्रमुख संजय बारकुंड साहेबांच्या कार्य पध्दतीवरुन जिल्ह्यातील सामान्य तील सामान्य जनतेला कळत असताना.
पोखरलेल्या व्यवस्थेत प्रामाणिकपणे शिस्त लावतांना "कभी खुशी"कभी गम "मध्ये खाकीच्या व्यवस्थेतील काम न करता चमकोगीरी करणाऱ्यांचा भ्रमनिरास होतोय का ? हाच खरा प्रश्न आहे त्यापेक्षा ह्या अधिकार्याची कार्यपद्धतीचा अंदाज येत नाही हेच खरे दुःख अशांतता निर्माण करण्यांमध्ये आहे.यातील सत्य न कळणारे जिल्ह्यात वेळोवेळी वेगवेगळ्या माध्यमातून कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा अयशस्वी प्रयत्न करतांना दिसतात यातील प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यवस्थेतील नजरेआड आणि दुर्लक्षीत परंतु क्षमता असणारे कर्मचारी आणि धुळे जिल्ह्यातील जनता जिल्हा प्रमुखांच्या कार्य पध्दतीवर कमालीची खूष आहे.

कोणाला अंदाज येत नाही परंतु अत्यंत सुक्ष्म निरीक्षण आणि कमालीचा संपर्क असल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात घडलेल्या कोणत्याही घटनेची तातडीने दखल घेऊन जिल्ह्यातील शांतता आबाधीत ठेवण्याचे काम चोखपणे करीत आहेत सत्य हे प्रामाणिक कर्तव्यात लपून आहे.जिल्हा प्रमुख नेमका कोणाचा माणूस या शोधात असलेल्या तथाकथित संशयीतांना कळायला लागले हा माणूस कर्तव्याला प्रथम प्राध्यान देणारा आहे जनता खूष आहे कोणत्याच आरोपीची सुटका नाही आणि निर्दोष व्यक्तीवर कारवाई नाही, यातील समन्वय जपतांना जिल्ह्यातील तथाकथित बुद्धिभेदाने सामाजिक वातावरण दूषीत करणाऱ्यांना बारकुंड साहेबांची कार्यपद्धतीचा अंदाज येत नाही यातच जिल्ह्यातील शांततेचा खरा मंत्र लपलेला आहे.संपूर्ण धुळे जिल्ह्यात प्रत्येक सामान्य माणसाला जिल्हा प्रमुख आणि त्यांची कार्य पद्धती कमालीची प्रभावीत करीत आहे आणि म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्रात जातीय तणाव असताना आज धुळे जिल्हा शांत शांत आहे.

रात्र असो या पहाट सुट्टी असताना सुध्दा जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस स्टेशन मध्ये घडलेल्या घटनेवर वैयक्तिक लक्ष आहे.चांगले काम करणाऱ्या आपल्या विभागातील कर्मचाऱ्यांना शाबासकीची थाप देताना चमकोगीरी करणाऱ्यांना अजिबात स्थान नाही मग तो कोणाच्या राजकीय आशीर्वादाने जरी असला तरी पहिले प्राध्यान जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यस्थेला जिल्ह्यातील व्याप्ती खूप मोठी असली आणि घडलेल्या अनेक घटनेत पोलिसांवर आरोप होत असले,तरी प्रामाणिकपणे मान्यच करावे लागेल कि आज धुळे जिल्हा फक्त बारकुंड साहेबांमुळे सुरक्षित आहे.याच दुवा काम करतांना जातीय पलीकडच्या असतात.यालाच प्रामाणिकणे कार्य म्हणतात ....

🙏लेखन- पंडित बेडसे सर ✒️

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध