Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०२४
सर्व जाती धर्माचा जिप गट महायुतीच्या पाठीशी- ऍड व्ही आर पाटील यांचा विश्वास
अमळनेर : सर्व जाती धर्मातील, सर्व क्षेत्रातील आणि सर्व स्तरातील लोक जेथे मिळून मिसळून राहतात तो गट म्हणजे आमचा कळमसरे- जळोद जिल्हा परिषद गट क्रांतीकारकांचे योगदान आणि विविध देवस्थानांचे वैभव लाभलेला हा परिसर कायम भाजपच्याच सोबत राहिला असून यंदाही महायुतीच्याच पाठीशी असल्याने महायुतीचे उमेदवार अनिल भाईदास पाटील यांना संपुर्ण गटातून भरभरून असे मतदान होईल असा विश्वास भाजपाचे माजी जि प सदस्य ऍड व्ही आर पाटील यांनी व्यक्त केला आहे.
या धार्मिक आणि क्रांतिकारकांच्या भूमीला विकासाभिमुख करण्याचे काम मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांनी केले असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.आणि विकास केला म्हणून जनतेने देखील त्यांना साथ नक्कीच दिली पाहिजे आणि देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.विकास कामा संदर्भात अधिक बोलताना ते म्हणाले की पाडळसरे येथील निम्न तापी प्रकल्पाला मिळालेली गती असेल तसेच या प्रकल्पाला मिळालेली 4800 कोटींची सुप्रमा असेल किंवा त्यानंतर केंद्रीय योजनेसाठी पाठपुरावा असेल यासाठी अनिल दादांचे परिश्रम निश्चितच कौतुकास्पद आहेत.याव्यतिरिक्त गावोगावी नवीन पाणीपुरवठा योजना देऊन पाणी प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न नक्कीच झाला आहे.हिंगोणे येथे बोरी नदीचे पाणी अडविण्यासाठी मृदू व जलसंधारण अंतर्गत 134 कोटींचे दोन सिमेंट बंधारे म्हणजे शेतकरी बांधवासाठी कृषी संजीवनी चा मार्गच ठरला आहे.भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या देवस्थानांचा दर्जा उचविण्यासाठी कपिलेश्वर व्यतिरिक्त नंदगाव येथील श्रीराम मंदिरासाठी तब्बल 2 कोटी निधीतून मोठा कायापालट केला,याव्यतिरिक्त या गावासाठी ग्रा प इमारत व सभामंडप यासाठीही निधी दिला,अंतुर्लीत कार्तिक स्वामी मंदिरासाठी सभामंडप देऊन भाविकांची सोय केली.गोवर्धन येथील काळभैरव मंदिरात सरंक्षण भिंत देऊन मंदिर सुरक्षित केले. .
गावोगावी असा शाश्वत विकास या भूमीपुत्राने करून दाखविला असल्याने विकास आणि महायुती या दोन गोष्टीं या गटातून त्यांना मतदान करण्यासाठी पुरक असून प्रचार दौऱ्यात प्रत्येक गावातून त्यांना प्रतिसाद मिळाला आहे. गटातील प्रत्येक व्यक्ती व आमचा संपूर्ण भाजप परिवार त्यांच्या सोबत आहे. मतदानाच्या दिवशी निश्चितच त्यांच्यावर मतांचा भरभरून असा पाऊस पडेल असा विश्वास व्ही आर पाटील यांनी व्यक्त केला
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा