Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २१ मे, २०२५
चारचाकीने रिक्षाला धडक दिल्यावरून रिक्षाचालक जागीच ठार
अमळनेर : चारचाकीने रिक्षाला धडक दिल्यावरून रिक्षाचालक जागीच ठार झाल्याची घटना २० रोजी सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास तालुक्यातील मंगरूळ येथील गॅनी च्या ढाब्याजवळ घडली.*
ताडेपुरा येथील भटू दिलीप पाटील वय २९ हा आपल्या रिक्षा क्रमांक एम एच ४१ ए एक्स १३५६ वर लोंढवे येथे पॅसेंजर सोडायला गेला होता. तो लोंढाव्याहून अमळनेर परत येत असताना अमळनेरकडून जाणाऱ्या एका चारचाकी एम एच१८ ए जे ५५८८ ने भरधाव वेगाने येऊन जोरात धडकदिल्याने रिक्षा चालक जागीच ठार झाला. चारचाकी चालक अविनाश भैय्यासाहेब पाटील रा दहिवद याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०६(१) ,२८१, १२५ (अ),१२५(ब), ३२४(४) ,मोटरवाहन कायदा १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहाय्यक फौजदार संजय पाटील करीत आहेत.
भटू याने प्रेमविवाह केला असून नवे घर बांधायला घेतले आहे. काही दिवसांपूर्वीच त्याच्या आईचे निधन झाले होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा