Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, २६ ऑगस्ट, २०२६

निरोगी जीवनासाठी जीवनशैलीत सकारात्मक बदल आवश्यक,डॉ. जगन्नाथ दीक्षितदिवसातून दोनदाच आहार घेण्याचा आग्रह.



बापू चव्हाण दिंडोरी:-

     आधुनिक जीवनशैलीमुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होत असून, निरोगी व आनंदी जीवनासाठी दिवसातून फक्त दोनच वेळा आहार, व्यायाम आणि शिस्तबद्ध दिनचर्येचा अंगीकार करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध जीवनशैली तज्ज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी केले.मोहाडी येथे श्रीकृष्ण प्रबोधन व्याख्यानमालेत ‘जीवनशैली’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.श्री अष्टबाहू गोपालकृष्ण देवस्थान व कर्मयोगी कै.एकनाथभाऊ जाधव फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित या व्याख्यानमालेतील हे पाचवे पुष्प ग्रामस्थांच्या वतीने कृतज्ञता म्हणून माजी सरपंच कै. सुरेश तुळशीराम गावित यांच्या स्मृतीस अर्पण करण्यात आले.डॉ.दीक्षित यांनी आपल्या व्याख्यानातून बदलत्या जीवनशैलीचे आरोग्यावर होणारे परिणाम, योग्य सकस आहाराचे महत्त्व, नियमित व्यायाम,वजन नियंत्रण आणि दैनंदिन जीवनातील आरोग्यदायी सवयी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.  
       जीवनशैलीत दिवसातून फक्त दोनदाच आहार घेण्यासह योग्य बदल केल्यास अनेक आजारांपासून दूर राहता येते,असा संदेश त्यांनी दिला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मविप्र समाज संस्थेचे चिटणीस दिलीप दळवी होते. यावेळी सह्याद्री ॲग्रो फार्मचे विलास शिंदे,निफाड तालुका वकील संघाचे अध्यक्ष प्रवीण ठाकरे,तुळशीराम गावित उपस्थित होते.
        कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्याख्यानमाला संयोजन समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.विलास देशमुख यांनी केले.सूत्रसंचलन धनंजय वानले यांनी तर आभार प्रा. धनंजय देशमुख यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध