Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, १९ ऑगस्ट, २०२६
Home
/
/
कथित बनावट शालार्थ आयडी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सीईओ-शिक्षणाधिकारी दौरा चर्चेत संबंधित शाळांमध्ये प्रत्यक्ष चौकशी होणार का? जनतेतून प्रश्न; मुख्याध्यापकांना विविध शालेय नोंदी व व्यवस्थापनाची पूर्तता करण्याच्या सूचना
कथित बनावट शालार्थ आयडी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सीईओ-शिक्षणाधिकारी दौरा चर्चेत संबंधित शाळांमध्ये प्रत्यक्ष चौकशी होणार का? जनतेतून प्रश्न; मुख्याध्यापकांना विविध शालेय नोंदी व व्यवस्थापनाची पूर्तता करण्याच्या सूचना
साक्री प्रतिनिधी : कथित बनावट शालार्थ आयडी प्रकरणात साक्री तालुक्यातील काही शाळांची नावे समोर आल्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे. त्यातच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि शिक्षणाधिकारी यांचा साक्री तालुक्यात दौरा नियोजित असल्याची माहिती समोर आल्याने संबंधित शाळांमध्ये प्रशासनाच्या पाहणीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर मुख्याध्यापकांना पाठविण्यात आलेल्या सूचनांमध्ये शाळेतील स्वच्छता, शालेय नोंदी, पोषण आहार, विद्यार्थ्यांची हजेरी, शिक्षक हजेरी, अभ्यासक्रमाची प्रगती, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच शाळेतील विविध भौतिक सुविधांची तपासणी करून आवश्यक त्या बाबी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे दिसून येते.
दौऱ्यापूर्वी शाळांमध्ये विविध बाबी तपासण्याच्या सूचना
मुख्याध्यापकांना देण्यात आलेल्या सूचनांनुसार वर्गखोल्यांमध्ये अडगळीचे साहित्य ठेवू नये, बंद असलेले टीव्ही, प्रोजेक्टर किंवा संगणक तातडीने दुरुस्तीसाठी पाठवावेत, वर्गखोल्यांची स्वच्छता व सजावट करावी, विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
तसेच गणवेश व पाठ्यपुस्तकांचे रेकॉर्ड पूर्ण आहे का, शालेय पोषण आहाराच्या धान्य साठा नोंदवहीतील नोंदी आणि प्रत्यक्ष साठा यामध्ये ताळमेळ आहे का, स्वच्छतागृहांची स्वच्छता झाली आहे का, याची खातरजमा करण्यास सांगण्यात आले आहे.
धोकादायक वर्गखोल्या असल्यास त्या परिसरात सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करून सूचना फलक लावण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. शाळेच्या आवारातील कचरा व घाण साफ करणे, पिण्याच्या पाण्याची टाकी स्वच्छ ठेवणे आणि टाकी स्वच्छ केल्याची तारीख नोंदविणे यावरही भर देण्यात आला आहे.
अभ्यासक्रम व विद्यार्थ्यांच्या प्रगतीवरही लक्ष
प्रत्येक वर्गशिक्षकाला आपल्या वर्गाचा आतापर्यंत किती अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे, याची स्पष्ट माहिती असणे आवश्यक असल्याचे सूचित करण्यात आले आहे. तसेच प्रत्येक वर्गातील निपुण विद्यार्थ्यांची संख्या आणि शंभर टक्के विद्यार्थ्यांना निपुण करण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती शिक्षकांकडे असणे अपेक्षित असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
वर्गखोल्यांमधील जाळे-जळमटे काढणे, विद्यार्थी व शिक्षक हजेरीतील सर्व नोंदी पूर्ण करणे, शालेय पोषण आहार नवीन मेनूनुसार देणे आणि चव रजिस्टरमधील नोंदी अद्ययावत ठेवणे, अशा विविध बाबी तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कथित शालार्थ आयडी प्रकरणाची चौकशी होणार का?
दरम्यान, या नियमित प्रशासकीय पाहणीच्या सूचनांबरोबरच कथित बनावट शालार्थ आयडी प्रकरणात ज्या शाळांची नावे चर्चेत आली आहेत, त्या शाळांमध्ये सीईओ व शिक्षणाधिकारी प्रत्यक्ष भेट देऊन संबंधित कागदपत्रे, नोंदी व प्रशासकीय बाबींची स्वतंत्रपणे पडताळणी करणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
केवळ नियमित शालेय पाहणी न करता, या प्रकरणाशी संबंधित शाळांची निष्पक्ष, पारदर्शक आणि सखोल चौकशी करण्यात यावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. संबंधित शाळांमध्ये प्रत्यक्ष पाहणी झाल्यास शालार्थ आयडी, संचमान्यता, शिक्षक पदे, विद्यार्थी संख्या आणि उपलब्ध शालेय नोंदी याबाबतची वस्तुस्थिती स्पष्ट होण्यास मदत होऊ शकते.
या प्रकरणातील आरोपांची अधिकृत चौकशी व निष्कर्ष समोर येईपर्यंत संबंधित व्यक्ती अथवा संस्थांना दोषी ठरविणे योग्य ठरणार नाही. मात्र, दौऱ्याच्या निमित्ताने प्रशासन संबंधित शाळांमध्ये प्रत्यक्ष जाऊन वस्तुस्थिती तपासणार का आणि जनतेच्या प्रश्नांना अधिकृत उत्तर मिळणार का, याकडे आता साक्री तालुक्यासह शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील डमाळे वस्ती येथे घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लांबवणार्या गुजरात र...
-
क्रांती झाली आणि भारतात जनता आनंदी झाली. इंग्रज देश सोडून गेलीत? का तर भारतीय जनता ब्रिटिशशाई विरोधात एकवटली होती. जनता स्वराज्य सुराज्य जे...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा