Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ३० जुलै, २०१९

आधारकार्ड काढणे कामी नविन दुसरे केंद्र रावेर शहरात सुरु करणे बाबचे निवेदन भारिप बहुजन महासंघ व MIM यांच्या वतीने तहसिलदार यांना देण्यात आले




रावेर (प्रतिनिंधी)अजीज शेख  दि.३० येथील तहसिलदार उषाराणी देवगुणे यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे. की, रावेर शहरामध्ये आधारकार्ड केंद्र एकच असल्याने  रावेर तालुक्यातील लोकांचे हाल होत आहे. आधारकार्ड केंद्रावर चार ते पाच तास स्रीया, लहान बाळ, व म्हातारी लोक लाईन मध्ये उभे राहुन  त्रस्त होत आहे व 

खुप त्रास सहन करावा लागत आहे. संपुर्ण रावेर तालुक्यातील खेळो पाळ्यातील स्त्री,पुरुष लहान बाळ व म्हातारे लोक आपले काम धन्दे सोडुन दिवसभर आधार कार्डासाठी लाईनी मध्ये बसुन राहत आहे.दहा मिनिटाचे आधार कार्ड 

काढण्यासाठी चार ते पाच तास लागत आहे. व काही लोक गर्दी असल्यामुळे भाडे तोडे खर्च करुन आल्यावर सुद्धा वेळे अभावी नंबर लागत नसल्यामुळे त्यांना घरी परत जावे लागते. म्हणजे गोर गरीब मानसाचे खुप हाल होत आहे. आणी पैसे ही खर्च होत आहे, व मजुरी सुद्धा बुळत आहे त्यामुळे रावेर शहरामध्ये अजुन एक दुसरे आधाराकर्ड केंद्र सुरु करण्यात यावे अशी मागणी रावेर तालुका भारिप बहुजन महासंघ व MIM यांच्या वतीने तहसिलदार यांना दिलेल्या निवेदणात म्हटले आहे.

निवेदनावर भारिप बहुजन महासंघाचे ता.अध्यक्ष बाळु शिरतुरे, MIM रावेर अध्यक्ष शे. वशीम ,रावेर उपाध्यक्ष शे. शरिफ,सचिव शे. अकबर, शे.अनिस,शे. सलमान,शे. जफर, शे.मुस्तकिन इत्यादीच्या निवेदनावर सहया आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध