Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १३ ऑगस्ट, २०१९

बहाळ येथील नारळी नदीवरील बाधर्‍याचे जलपूजन खोलीकरण्याची व ऊंची वाढविण्याची मागणी करण्यात आली







प्रतिंनिधी बहाळ संतोष भोई नारळी आणि उतावळी या दोन्ही नदीच्या सगमावर सहा महिन्या पूर्वी बाधलेल्या बाधरा पाऊसाच्या पाण्याने नुकताच तुडुंब भरल्याने त्याचे जलपूजन चाळीसगाव पंचायत समितीच्या सभापती स्मितल बोरसे यांच्या हस्ते 

करण्यात आले . या नदीला  पाऊसात येणारे पाणी वाहून जात होते . मात्र हा बंधारा बाधल्याने 250 ते 300 हेक्टर क्षेत्र ओलिता खाली येणार आहे .याबाधार्‍यामुळे विहीरच्या पाण्याची पातळीत वाढ झाली आहे . या भागात मोठ्या प्रमाणात 

फळबागा होत्या मात्र मागील वर्षी दुष्काळ असल्याने फलबाग सुकून गेल्यात . माजी पंचायत समिती सदश्य दिनेश बोरसे यांना आमदार उन्मेष पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून मंजूर केले .आणि तत्काल बाधरा पूर्ण केल्याने सद्य सुरू असलेला पाऊळ्यात वाहून जाणारे पाणी अडविण्यात आले .याचा फायदा 

याभागातील शेतकर्यांना होणार आहे 26 लाख रुपये खर्च करून हा बंधारा बाधण्यात आला आहे. याचा फायदा खेडगाव बहाळ आदि गावाच्या शेतकर्‍याचा होणार आहे .उन्हाळयात याभागात पिण्याला पाणी देखील मिळत नहोते मात्र हा बंधारा याभागातील शेतकर्‍यांना वरदान ठरणार आहे . यावेळी बाधर्‍याची ऊची व 

खोलीकरण्याची  मागणी उपस्थित शेतकर्‍यांनी केली . यावेळी सभापती स्मितल बोरसे माजी पंचायत समिती सदश्य दिनेश बोरसे ,रमेश महाजन ,दशरथ मोरे , सोपान महाजन ,सहादू चौधरी ,ईश्वर चौधरी,गुलाब चौधरी सखाराम चौधरी ,पिंटू महाजन ,आसिफ मण्यार , सतीश चौधरी ,पंढरीनाथ चौधरी ,विनोद चौधरी , अनिस मण्यार भैय्या सोनार आदि शेतकरी उपस्थित होते .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध