Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १० जानेवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
धुळे जिल्हा परिषदेत भाजपचे 'कमळ'!- भाजपला ३९, महाविकास आघाडीला १४ तर तीन जागांवर अपक्ष- चारही पंचायत समित्यांवर भाजप निर्विवादम टा...
धुळे जिल्हा परिषदेत भाजपचे 'कमळ'!- भाजपला ३९, महाविकास आघाडीला १४ तर तीन जागांवर अपक्ष- चारही पंचायत समित्यांवर भाजप निर्विवादम टा...
प्रतिनिधी:धुळे जिल्हा परिषदेत भाजपचे 'कमळ'!
भाजपला ३९, महाविकास आघाडीला १४ तर तीन जागांवर अपक्ष
चारही पंचायत समित्यांवर भाजप निर्विवाद धुळे जिल्हा परिषदेच्या आजपर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपने बहुमताचा जादुई आकड्यापेक्षा अधिक तब्बल ३९ जागा पटकावल्या.
अनेक वर्षांपासून जिल्हा परिषदेवर काँग्रेस, राष्ट्रवादीची एकहाती सत्ता होती. अखेर ती सत्ता खेचण्यात भाजपच्या नेत्यांना यश आल्याने महापालिकेपाठोपाठ आता जिल्हा परिषदेतही भाजपचे 'कमळ' फुलले आहे.
एकूण ५६ जागांपैकी भाजपने ३९ तर काँग्रेसला ७, राष्ट्रवादीला ४ आणि शिवसेनेला ३ जागांवर विजय मिळविता आला. धुळ्यात महाविकास आघाडीला केवळ १४ जागा मिळून हा प्रयोग फसल्याचे या निकालावरून स्पष्ट झाले आहे.
तीन जागांवर अपक्षांनी विजय मिळविला.
धुळे जिल्हा परिषदेत काँग्रेस, राष्ट्रवादीने गेली अनेक वर्षे बेरजेचे राजकारण केले. शिवाय, विरोधकांना चितपट करीत याच सत्तेच्या आधारे काँग्रेस, राष्ट्रवादीने पंचायत समित्या, ग्रामपंचायतींमध्ये आपली पाळेमुळे घट्टपणे रुजविली होती.
मात्र, आता भाजपच्या विजयाने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे. गेल्यावेळेस काँग्रेसने ३० जागा जिंकल्या होत्या तर राष्ट्रवादी, शिवसेनेला अनुक्रमे सात आणि दोन जागा मिळाल्या होत्या.
भाजपने तेरा जागांवर विजय मिळविला होता.
यावेळच्या जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसने २३, राष्ट्रवादीने तीन जागा गमावून सत्ताही घालवली आहे. शिवसेनेची मात्र गेल्यावेळेपेक्षा एक जागा वाढली आहे. जिल्ह्यातील शिंदखेडा, साक्री, शिरपूर आणि धुळे या चारही पंचायत समित्यांतही भाजपने वर्चस्व सिद्ध करीत महाविकास आघाडीला धूळ चारली आहे.
भाजपचे संघटन, तर 'मविआ'ची दाणादाण
राज्यात भाजपची सत्ता असतानाही धुळे जिल्हा परिषद प्रशासकाच्या ताब्यात जाईपर्यंत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ताब्यात होती. जिल्हा परिषद ताब्यात घेण्याचा भाजपने अनेकदा प्रयत्न केला. परंतु, तो यशस्वी होऊ शकला नव्हता मात्र आता थेट बहुमताद्वारे सत्ता मिळविल्याने भाजपची सरशी झाली आहे. २०१४ मध्ये भाजप केंद्रासह राज्यात सत्तेवर आल्यानंतर येथील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ता स्थानांना काहीसा हादरा बसून काही पंचायत समिती, नगरपंचायत, नगरपालिका भाजपच्या ताब्यात गेल्या.
परंतु, जिल्हा परिषदेवर काँग्रेस-आघाडीच प्रस्थापित होती. या निकालानंतर काँग्रेसचे माजी मंत्री रोहिदास पाटील, आमदार कुणाल पाटील, डॉ. हेमंत देशमुख या नेत्यांना धक्का बसला असून, आमदार अमरीश पटेल, राजवर्धन कदमबांडे, सुभाष देवरे, मनोहर भदाणे यांनी भाजपप्रवेश केल्यामुळे जिल्हा परिषदेत सत्तेसाठी चुरस निर्माण झाली होती. विशेष म्हणजे, या नेत्यांच्या अगोदरच प्रस्थापित असलेले माजी मंत्री खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार जयकुमार रावल यांनीही या विजयात महत्त्वाची भूमिका निभवल्याने हा विजय प्रत्यक्षात आल्याचे कार्यकर्ते सांगतात. राष्ट्रवादीचे नेते तथा माजी आमदार अनिल गोटे यांनाही या पराभवाने धक्का मानला जात असून, जिल्हा परिषदेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेने महाविकास आघाडी स्थापली. मात्र, यामध्ये समन्वय न दिसता सर्वत्र खिचडी झाल्यानेच हा पराभव झाल्याचे दिसते. एकच मोट बांधून ठेवणारा जिल्हा नेता नसल्याने आघाडी नेतृत्वहीन दिसून आली. स्टार प्रचारकांवर महाआघाडी विसंबलेली दिसली.
त्यामुळे भाजपने संघटनाच्या जोरावर ही निवडणूक लढविली. तर महाविकास आघाडीचे सरकार आणि कर्जमुक्तीची घोषणा याचा फायदा या निवडणुकीत होईल यावरच भिस्त दिसून आल्याने त्यांची दाणादाण झालेली दिसून आली.
मुद्द्यांपेक्षा नेत्यांचीच निवडणूक
ही निवडणूक मुख्य मुद्यांवर लढली गेलीच नाही तर वैयक्तिक प्रतिमेवर लढली गेली. पक्षाच्या भूमिकेपेक्षा उमेदवारांचे वैयक्तिक संबंध, नियोजन याचाच प्रभाव निवडणुकीत दिसून आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल गोटे यांची जादू ग्रामीण भागात चालू शकत नाही हे पुन्हा एकवार सिद्ध झाले.
त्यांनी या निवडणुकांमध्ये स्थानिक मुद्यांवर भर न देता फडणवीस, महाजनांवर तोफ डागण्यावर जोर दिला. उलटपक्षी भाजपने जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीतील सर्व गणांवर आपले उमेदवार दिले. संघटित होत त्यांनी महाविकास आघाडीचा सडेतोड प्रतिकार केला.
पक्षीय बलाबल (२०१३)
काँग्रेस ... ३०
भाजप ... १३
राष्ट्रवादी... ०७
शिवसेना ... ०२
अपक्ष ... ०४
एकूण ... ५६
............................
पक्षीय बलाबल (२०२०)
भाजप ... ३९
काँग्रेस ... ०७
राष्ट्रवादी ... ०४
शिवसेना ... ०३
अपक्ष ... ०३
एकूण ... ५६
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संदीप अवधूत :- नाशिक जिल्ह्यात असलेल्या दिंडोरी तालुक्यातील लखमापूर गावाजवळील औद्योगिक प्रकल्पामुळे कथितरीत्या गंभीर पर्यावरणीय प्रदूषण होत ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा