Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २१ जानेवारी, २०२०
नवऱ्याच्या पित्याने नवरीच्या आईलाच पळवले
सुरत:प्रतिनिधी: गुजरात राज्यातील सुरत जिल्ह्यातील दोन कुटुंबामधील वादामुळे जुळलेले लग्न तुटण्याची घटना घटली आहे. या जोडप्याचे लग्न फेब्रुवारी महिन्यात व्हायचे होते.
मात्र, लग्न होण्यापूर्वीच नवऱ्याच्या वडिलांनी नवरीच्या आईला पळवून नेल्याने मोठा पेच निर्माण झाला. यामुळे हे लग्न तुटले. याबाबत कुंटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, नवऱ्याचे वडील आणि नवरीची आई पूर्वीपासूनच एकमेकांना ओळखत होते. त्यांचे एकमेकांवर
प्रेम असावे आणि म्हणून त्यांनी पळून जाऊन लग्न केले असावे असे त्यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
गुजरातः ८ वीच्या विद्यार्थ्याला घेऊन शिक्षिका पळाली
सुरतमधील काटरगाम परिसरात राहणाऱ्या या तरुणाचे लग्न नवसारी येथे राहणाऱ्या एका तरुणीशी ठरले होते.
लग्नाच्या एक महिन्यापूर्वी नवरीची आई बेपत्ता झाली. त्या नंतर तिच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दिली. दरम्यानच्या काळात नवऱ्याच्या वडिलांनीही आपले घर सोडले. शोध घेतल्यानंतरही त्यांचा ठावठिकाणा लागत नसल्याने नवऱ्याच्या कुटुंबीयांनी देखील नवऱ्याचे वडील बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली.
'पूर्वीपासूनच एकमेकांना ओळखत होते'
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोघे पूर्वीपासूनच एकमेकांना ओळखत होते. तारुण्यात दोघांना लग्न करायचे होते. पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतरही दोघांचा ठावठिकाणा लागला नसल्याचे पाहून या दोन्ही कुटुंबीयांनी अखेर ठरलेले लग्न मोडले. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारीत होणाऱ्या या लग्नासाठी दोन्ही कुटुंबांनी जय्यत तयारी सुरू केली होती.
एक वर्षापूर्वीच हे लग्न जुळवण्यात आले होते. या लग्नाला तरुण आणि तरुणीची सहमती होती. मात्र, आपल्या माता-पित्याच्या बेपत्ता होण्याचे प्रकरण घडल्यानंतर या दोन्ही कुटुंबांनी ठरलेले लग्न मोडण्याचा निर्णय घेतला.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
🟩 अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर तालुक्यात वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांचे हाल होत असून, उष्माघात व आजारामुळे चौघांचा मृत्यू झाल्याच्या घटना समो...
-
संदीप अवधूत :- आंबेडकरी चळवळीची बुलंद तोफ, रिपब्लिकन सेनेचे नेते झुंजार पत्रकार सक्षम पोलीस टाइम्सचे उपसंपादक संजय दोंदे यांची आखिल भारतीय ...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा