Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २१ फेब्रुवारी, २०२०

“सुह्यदयी” पुस्तकाचे प्रकाशन संपन्न


महाराष्ट्र शासन साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य व साप्ताहिक विवेकचे उपसंपादक श्री रविंद्र गोळे यांनी लिहिलेल्या ‘सुह्यदयी’या पुस्तकाचे प्रकाशन यमगरवाडी ता.तुळजापूर येथे संपन्न झाले.

एकलव्य विद्या संकुल येथे महाशिवरात्र स्नेहमेळाव्यात आयोजित केलेल्या माजी विद्यार्थी एकत्रीकरणात या पुस्तकाचे विशेष प्रकाशन करण्यात आले श्री.रविंद्र गोळे यांची आज पर्यंत ३५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी शोधनिबंध सादर केले आहेत.

सामाजिक क्षेत्रात प्रसिद्धी पासून अलिप्त राहून निरलसपणे काम करणाऱ्या सहा व्यक्तींच्या जीवनकार्याचा परिचय त्यांनी या पुस्तकात करून दिला आहे.

यामध्ये ‘युनिस्को’या जागतिक संघटनेने दखल घेतलेल्या ‘पालावरची शाळा’या विषयाचे काम करणारे उमाकांत मिटकर, आदिवासी बांधवांसाठी अहर्निश झटणारे प्रमोद करंदीकर, सौर ऊर्जेसाठी काम करणाऱ्या सुनंदाताई पटवर्धन, दुर्बल विद्यार्थ्यांसाठी काम करणारे रवींद्र कर्वे, वनवासी बांधवांना सन्मान देणारे पद्मश्री चैत्राम पवार,अध्यात्म क्षेत्रातील ह.भ.प.शिवाजी मोरे यांचा समावेश आहे 
सदरील पुस्तकाचे प्रकाशन माजी मंत्री आमदार राणाजगजितसिंह पाटील, भटके-विमुक्त विकास प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ.अभय शहापूरकर,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी श्री विवेक आयाचीत लेखक श्री रविंद्र गोळे,तपस्वी चॅरीटेबल ट्रस्टचे ॲड. मिलिंद पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिताताई कांबळे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध