Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २७ मार्च, २०२०

निंभोरा येथील सेन्ट्रल बँक व्यवस्शापकांवर प्रशासन कारवाई करणार का?


रावेर तालुक्यातील निंभोरा  येथील सेन्ट्रल बँकेचे व्यवस्थापक नेहमी उशीरा येतात .
देशावर ओढलेल्या भल्यामोठ्या संकटावर जेथे संपूर्ण देशावर 'लॉक डाऊन'व महाराष्ट्र राज्यात संचारबंदी लावण्यात आली आहे.

अश्या परीस्थीतीत निंभोरा ता रावेर तेथ बँकेचे व्यवस्थापक हे नेहमी उशीरा येत आहे. जिवनाआवश्यक व अत्यंत गरज म्हणुन ज्याची म्हणजे पैसे ते काढण्यासाठी गोरगरीब व कष्टकरी जनता ही बँकेच्या कामकाजाच्या वेऴेत ही आपले पैसे मिळवण्यासाठी ताटकळत ऊभे रहावे लागत असल्याने कमालीची त्रासली असुन कर्मचारी वर्गाला विचारणा केली असता साहेब येताय असे सांगीतले जाते .
एकीकडे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी गवाही दिली आहे की जनतेने कसलीच परवा न करता घरात रहावे जेणेकरून त्यांची सुरक्षा होईल व संसारोपयोगी तसेच अत्यावश्यक वस्तू त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास कमी पडू देणार नाही व पण त्या साठी पैसेतर लागणारच पण हे महाशय कसल्याच गोष्टीची फिकीर न करता आपल्या मनमर्जीप्रमाणे वागत
आहे 

बँकेत ग्राहक गर्दी करून ताटकळत उभे असल्याचे चित्र  नेहमी दिसत आहे .
याकडे वरीष्टअधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा जनतेचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही असे दिसते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध