Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ३ मे, २०२०
ट्रकमधून उत्तरप्रदेशात निघालेल्या ४५ मजुरांना जळगावात घेतले ताब्यात
जळगाव प्रतिनिधी: नाशिक येथून आपल्या गावाकडे पायी प्रवास करून नंतर एका ट्रकद्वारे आपल्या घराकडे जाणाऱ्या ४५ मजुरांना जळगावच्या जिल्हापेठ पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांना क्वारंटाईनसाठी ठेवण्यात आले अशी माहिती पोलीस निरीक्षक अकबर पटेल यांनी दिली.
सूत्रांची माहिती अशी कि जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे पथक आज महामार्गावर गस्त असतांना एक ट्रक संशयित जात असल्याचे पोलीसांच्या लक्षात आला. त्यांनी ट्रकचा पाठलाग करून प्रभात चौकात पकडला. यात ४५ परप्रांतीय मजूर असल्याचे निष्पन्न झाले. नाशिक येथून पायी चालत असतांना पुढे जाण्यासाठी ते ट्रकमध्ये बसले होते. पोलीसांनी अधिक चौकशी केली असता सर्व मजूर नाशिक येथून उत्तरप्रदेशात आपापल्या गावाकडे जात असल्याचे समजले.
दरम्यान मजूरांपैकी कोणाकडेही परराज्यात जाण्याची कोणतीही परवानगी नसल्याचे पोलीस निरीक्षक अकबर पटेल यांनी खबरदारी म्हणून सर्वांतना तातडीने जिल्हा कोवीड रूग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले असून सर्वांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. जिल्हा पेठ पोलीसांनी ट्रकचालकास ताब्यात घेतले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा