Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ३ मे, २०२०
Home
/
Unlabelled
/
अँड रविंद्र भैय्या पाटील, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी जळगाव, पक्ष श्रेष्ठींनी यांच्या त्यागाची जाणीव ठेवून , कामांची, निष्ठेची पावती म्हणून विधानपरिषद सदस्यपदी नियुक्तीची मागणी, -रावेर तालुका कार्याध्यक्ष विलास ताठे
अँड रविंद्र भैय्या पाटील, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी जळगाव, पक्ष श्रेष्ठींनी यांच्या त्यागाची जाणीव ठेवून , कामांची, निष्ठेची पावती म्हणून विधानपरिषद सदस्यपदी नियुक्तीची मागणी, -रावेर तालुका कार्याध्यक्ष विलास ताठे
प्रतिनिधी रावेर आज पर्यंत राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्येष्ठ नेते मा श्री शरद चंद्र पवार साहेब, उपमुख्यमंत्री मा ना अजित दादा पवार, खासदार सौ सुप्रियाताई सुळे मा ना जयंतराव पाटील साहेब, मा ना दिलीपराव वळसे पाटील साहेब,मा ना छगन भुजबळ साहेब मा अरूणभाई गुजराती साहेब,यांच्या नेतृत्वाखाली काम करणारा , सच्चा एक सामान्य कार्यकर्ता म्हणजे अँड रविंद्र भैय्या पाटील होय, पक्षाने ज्या जबाबदाऱ्या दिल्या त्या प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करत आहे. पक्ष देईल तो आदेश पाळायचा हेच त्यांना नेहमीच माहिती असते.
ते सत्तेसाठी काम करणारे कार्यकर्ता नाही. ते पक्ष संघटनेसाठी काम करणारा कायमचाच कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे, ते कै, भाऊसाहेब प्रल्हादराव पाटील यांचा जनसेवेचा, सहकाराचा, संस्कारांचे वारसदार आहेत, शरदचंद्र पवार साहेब यांचें विचार, कार्य सर्व सामान्य जनतेच्या दारापर्यंत पोहचविण्याचे ते दिवस रात्र करीत असतात, म्हणून ज्या माणसानं आयुष्य भर साहेबांच्या विचारांवर आणि साहेबांवर निष्ठा ठेऊन काम केल .
त्यांना वेळोवेळी तुम्ही आदेश दिला त्या पद्धतीने ते वागले .
बर्याच वेळा पक्ष श्रेष्ठी नी
शब्द दिला विधानपरिषदेर घेऊ .
पण अद्याप ही त्यांचा
विचार केलेला दिसत नाही .
आयुष्य भर एकनिष्ठ राहीलेल्या माणसाला जर न्याय मिळत नसेल तर
भैय्यासाहेबांच्या वयाचा विचार करून आज हि योग्य वेळ आहे त्यांना न्याय देण्याची , म्हणून त्यांची विधानपरिषद सदस्यपदी बिनविरोध निवड झाली पाहिजे, त्यांना ताकद मिळाली,तर जळगाव जिल्ह्यातील सर्व आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे शिलेदार असतील यांत किंचितही
शंका नाहीं,
या आधी त्यांची राजकिय कारकीर्द सन 1991 ते 1995 या काळात जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष होते, तसेच त्यांनी सन 1995,99,2004,2009 या काळात त्यांनी मुक्ताईनगर या तालुक्यातून एकनाथ खडसे यांच्या विरोधात आमदार कि लढविली होती यावेळी यांना थोड्या फार म्हणजेच 1800 मतांनी विजयाची हुलकावणी खावी लागली होती, तसेच सन 1996 मध्ये जळगाव विधानसभा निवडणुकीत सुरेश दादा जैन यांच्या विरोधात आमदार कि लढतही त्यांनी दिली आहे,
तर सन 2009 मध्ये रावेर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आणि येथेही त्यांना रावेर तालुका स्थानिक मराठा समाजातील पण बसपाचे उमेदवार सुरेश चिंधू पाटील, तीस हजार मते घेऊन अँड रविंद्र भैय्या पाटील यांच्या पराभवास कारणीभूत ठरले , आणि त्यावेळी सुध्दा रविंद्र भैय्या पाटील यांना पराभूत व्हावे लागले, व त्यांच्या विजयांवर विरजण पडले, म्हणून रविंद्र भैय्या पाटील यांना कधी नशिब साथ देत नाही,तर कधी वेळ येते तेव्हा पक्ष श्रेष्ठी निर्णय बदलून घेतात, म्हणजे ऐकूणचं रविंद्र भैय्या पाटील यांना नेहमीच वाईटा च्या तोंडावर म्हणजे बलाढ्य विरोधकांसमोर लढत सातत्याने द्यावी लागली आहे, तरीही रविंद्र भैय्या पाटील यांनी सन 2009 मध्ये जळगाव जिल्ह्यातील एकूण सात आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेत निवडून पाठविले आहेत, त्यावेळी. रविंद्र भैय्या पाटील हे जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते, यामुळे संबंध जळगाव जिल्हा हा राष्ट्रवादीच्या झेंड्याखाली एकत्र होता, म्हणून रविंद्र भैय्या पाटील, ह्या देव माणसाला कधीही कोणताही पराभव हा मानसिक ताण वा नैराश्य त्यांच्या जिवनात शिवला नाही, कारणं ते स्वच्छ निष्कलंक, चारित्र्य संपन्न आणि आदि मुक्ताई चे अनन्य भक्त आहेत, त्यांची निष्ठा जेवढी पवार साहेब, राष्ट्रवादी पक्ष विचार सरणी वर आहे, तेवढीच आदि शक्ती मुक्ताई वर सुध्दा आहे, म्हणून ते जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी व सर्व सामान्य माणसांत आपलं वेगळेपण जपून आहेत,
म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी रविंद्र भैय्या पाटील यांना विधान परिषदेचे बिनविरोध निवड व्हावी म्हणून शुभेच्छा द्याव्यात अशी आशा मी विलास ताठे कार्याध्यक्ष रावेर तालुका राष्ट्रवादी कार्यकर्ता म्हणून प्रत्येकांना करतो, व आपल्या सर्वांच्या पाठिंब्यावर, सहकार्याने श्री रविंद्र भैय्या पाटील, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी जळगाव यांचीच विधान परिषदेच्या सदस्य पदी निवड होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो,
जय राष्ट्रवादी, मी सदैव आशा वादी ,
जय महाराष्ट्र..
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा