Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, ६ जुलै, २०२०

कोरोना शेतकऱ्यांच्या मानगुटीवर,पेरणी तोंडावर असतानाही पीक कर्ज मिळेना..!




जिल्ह्यात मान्सूनचे आगमन झाले असून दमदार झालेल्या पावसामुळे शेतकरी खरिपाच्या पेरणीसाठी कामाला लागला आहे. पेरणीसाठी बि-बियाणे व खते खरेदी करण्यासाठी अल्पभूधारक शेतकऱ्यांना तातडीने पीक कर्जाची गरज आहे. परंतु, फागणे येथील शेतकरी अद्यापही पीक
कर्जापासून वंचित आहे,फागणे सेंट्रल बँक
ऑफ इंडिया शाखेच्या अधिकारी कर्मचारी यांच्या हलगर्जी व निष्काळजीपणामुळे वारंवार फेरपटका मारून देखील पीक कर्जापासून शेतकरी त्रस्त झाले आहे, त्यामुळे शिवसेना उपतालुका प्रमुख विलास चौधरी यांनी बँक अधिकारी यांना धारेवर धरून पीक कर्ज तात्काळ देण्याची मागणी केली

राज्य सरकारकडून मिळालेले आदेश आणि बँकांचे नियम या गोंधळामुळे बहुतांश शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी बँक टाळाटाळ करीत आहेत.शिवाय शेतकऱ्यांना पीक विम्याचा देखील पुरेसा लाभ झालेला नाही. यामुळे खरिपाची पेरणी करावी तरी कशी? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे.

तर फागणे येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेच्या निष्काळजी व हलगर्जी अधिकारी कर्मचाऱ्यामुळे शेतकरी पीक कर्जेपासून वंचित आहे.शेतकऱ्यांनी कागदपत्रांची पूर्तता करून देखील बँक अधिकारी कर्ज देन्यास टाळाटाळ करत आहे त्यामुळे फागणे शाखेच्या  आवारात पीक कर्ज व पेशन घेण्यासाठी नागरिकांची तोबा गर्दी दिसून आली 

कोरोना संकट चा बहाणा करून उडवाउडवीचे उत्तरे बँक कर्मचाऱ्याकडून देण्यात येत आहे. 

त्यामुळे आज शिवसेना पक्षाचे उपतालुका प्रमुख विलास चौधरी यांनी आपल्या शिवसैनिकांसह  बँक अधिकारी याना जाब विचारून चांगलेच धारेवर धरले, 

पेरणीचा हंगाम सुरु असतानाही  शेतकऱ्यांचे नुकसान डोळ्यासमोर दिसतानाही  कागदपत्राची पूर्तता करून देखील शेतकरी पीक कर्जापासून अद्यापही का  वंचित आहे? असा प्रश्न विलास चौधरी यांनी उपस्थित केला, 

त्यांच्या समवेत यावेळी फागणे ग्रामपंचायत उपसरपंच युवराज सूर्यवंशी, सदस्य कैलास पाटील, हंसराज पाटील, विक्रम पाटील, 
भास्कर पाटील शेतकरी भटू चौधरी,  भाऊसाहेब पाटील, कृष्णा चौधरी,  कैलास धनगर आदी शेतकरी यावेळी उपस्थित होते,



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध