Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २४ ऑगस्ट, २०२०
कै.दादाराव मल्लाव समाजसेवेच्या पटलावरील एक हिरा काळाच्या पडद्याआड...!
पुणे प्रतिनिधी: राज्यातील समस्त मल्लावभोई समाजाच्या पटलावरील कोहिनूर हिरा, पुणे विभागातील मल्लावभोई समाजाचे अध्यक्ष स्वर्गीय दादाराव किसनराव मल्लाव यांचे शुक्रवार दिनांक 21 ऑगस्ट 2020 रोजी पहाटे 3 वाजून 45 मिनिटांनी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. स्वर्गीय दादाराव मल्लाव यांनी समाजविकासासाठी अनेक सामाजिक कार्य केले.
मल्लाव भोईसमाजाची शासनदरबारी ओळख निर्माण करतांना अतोनात प्रयत्न करून समाजाची नोंद करून घेतली. मल्लावभोई समाजाच्या एकत्रीकरणासाठी अधिकृत सोसायटीचीही स्थापना केली तसेच समाजातील काही खंडित झालेले पारंपारिक उत्सव त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन पुन्हा नवीन सुरुवात करून दिली.
समाजाची एकजूट व समाजसंघटन करण्यासाठी युवकांना प्रोत्साहित करून गावोगावी जावून मल्लावभोई समाजाची शाखा उद्घाटनाचे काम त्यांनी केले तसेच सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन लोकांमध्ये जनजागृती केली. युवापिढीची जनजागृती करण्यासाठी त्यांनी काही शालेय उपक्रम केले त्यामध्ये दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी दरवर्षी गुणवंत सोहळ्याच्या माध्यमातून बक्षीस वाटप कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
युवकांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही केले. समाजातील बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात ते अग्रभागी होते.
पूर्वीपासून समाजाला भेडसावणारी सर्वात मोठी अडचण म्हणजे जातीच्या दाखल्याची कै दादाराव यांनी जातीचे दाखले व जातवैधता प्रमाणपत्र समाजाला मिळविण्यासाठी आयोगाला वेळोवेळी पाठपुरावा केला व करत होते. मल्लावभोई समाजाला सरकार दरबारी सामाजिक, राजकीय आरक्षण मिळावे याकरिता महाराष्ट्रस्तरावर सामाजिक महामेळावे, संघटनेतुन प्रयत्न केले. दरवर्षी आषाढीवारी नंतर आळंदी ते पंढरपूर दिंडीचे आयोजन होते त्या दिंडीसाठी लागणाऱ्या समृद्धीसाठी समाजाचा एकत्रीकरणातून समाजातील ज्येष्ठ व्यक्ती पर्यंत पोहचवण्याचे कार्य मोठ्या कष्टाने पार पाडत होते. कोरोनाच्या संकट काळात त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सदर काळामध्ये समाजातील गरजू विद्यार्थ्यांना, काही कुटुंबांना घरोघरी जाऊन अन्नधान्य वाटप केले व आर्थिक मदतही केली तसेच समाजातील संकटकाळी उद्भवलेल्या अतिप्रसंगावर सरकारदरबारी जाऊन न्याय मिळविण्याकरिता पाठपुरवठाही केला.
मल्लावभोई समाजाचे लाडके, दानशूर, मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व, युवा पिढीचे प्रेरणास्थान, उत्तम संघटक, कार्यशील कार्यसम्राट अध्यक्ष स्वर्गीय दादासाहेब किसनराव मल्लाव हे आमच्यातुन अचानक जाण्याने समाजात कधी न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे.
निरपेक्षवादी समाजाचे नेतृत्व आज समाजात निर्माण होणे तरी कठीण होऊन बसले आहे. त्यांचे अपूर्ण कार्य पूर्ण करण्यातच त्यांना खरी श्रध्दांजली ठरेल असे तरी वाटते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा