Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, २६ सप्टेंबर, २०२०

कृषिमंत्री दादाजी भुसे यांचा उद्या उस्मानाबाद जिल्हा दौरा



उस्मानाबाद (राहूल शिंदे)दि.26 राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे हे दि. 27 सप्टेंबर रोजी उस्मानाबाद जिल्हा दौ-यावर येत असून त्यांचा दौरा तपशील पुढील प्रमाणे आहे.

रविवार, दि. 27 सप्टेंबर 2020 रोजी दुपारी 3:30 वाजता लातूर येथून शासकीय मोटारीने तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद कडे प्रयाण. 

सायंकाळी 5:30 वाजता तुळजापूर येथे आगमन व पाऊस आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा व कृषी विषयक योजनांची जिल्हास्तरीय आढावा बैठक. 

सायंकाळी 6:30 वाजता तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद येथून शासकीय मोटारीने सोलापूरकडे प्रयाण.

पावसामुळे जिल्ह्यात ठीकठिकाणी मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे, शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे.सोयाबीन,उडीद,मूग,ऊस पिकांचे नुकसान जास्त आहे.

कृषी मंत्री पाहणी करून कोणता निर्णय घेतात? काय घोषणा करतात याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
                  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध