Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, ३० सप्टेंबर, २०२०

समुपदेशन प्रक्रिया राबवून आंतरजिल्हा बदलीने हजर झालेल्या शिक्षकांना तातडीने पदस्थापना द्या.



उस्मानाबाद (राहुल शिंदे)दि.२९आंतरजिल्हा बदलीने हजर झालेल्या शिक्षकांना तातडीने समुपदेशन प्रक्रिया राबवून पदस्थापना द्यावी याबाबतची प्रहार शिक्षक संघटनेने जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिताताई कांबळे,मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार नवाळे,उप मुख्य कार्यकारी अधिकारी संजय तुबाकले, शिक्षणाधिकारी प्रा.रामलिंग काळे यांना निवेदना द्वारे करण्यात आली.

महाराष्ट्र शासन ग्राम विकास व जलसंधारण विभाग यांचे शासन निर्णय २४ सप्टेंबर २०१७ नुसार आंतर जिल्हा बदलीने हजर झालेल्या शिक्षकांचे समुपदेशन प्रक्रिया राबवून जिल्हा स्तरावरून थेट शाळेवर पदस्थापना देण्याचे निर्देश आहेत.

आंतर जिल्हा बदलीने हजर झालेल्या शिक्षकांना तब्बल दीड महिना होत आला तरी अद्यापही समुपदेशन प्रक्रिया राबवून संबंधित शिक्षकांना शाळेवर पदस्थापना देण्यात आलेल्या नाहीत.
बदलीने उपस्थित झालेल्या शिक्षकांना हजेरीपटावर सह्या करणेसाठी दररोज जिल्हा परिषदेला बोलावले जात आहे. आंतर जिल्हा बदलीने जि.प. उस्मानाबादला २८ शिक्षक उपस्थित झालेले आहेत.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता संबंधित शिक्षकांना दररोज सह्यासाठी जिल्हा परिषदेला बोलावणे धोक्याचे ठरू शकते.सह्यासाठी शिक्षकांची होत असलेली गर्दी टाळून कोरोना संक्रमणाचा धोका टाळावा अन्यथा जिल्हा परिषदेवर नामुष्की ओढवू शकते याचा विचार करता तात्काळ समुपदेशन घेऊन शाळेवर पदस्थापना देण्यात याव्यात अशा आशयाचे निवेदन देण्यात आले.

यावेळी प्रहार जिल्हाध्यक्ष वैजिनाथ सावंत, कार्याध्यक्ष विशाल अंधारे,जिल्हा नेते संतुक कडमपल्ले आदि.पदाधिकारी उपस्थितीत होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध