Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ८ सप्टेंबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
वादळी वाऱ्याने ऊसाचे पीक भुई सपाट,तात्काळ पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी....!
वादळी वाऱ्याने ऊसाचे पीक भुई सपाट,तात्काळ पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी....!
परंडा(राहुल शिंदे) दि.7 तालुक्यातील पांढरेवाडी व परिसरात रविवारी सायंकाळी मेघगर्जेनेसह जोरदार वादळी वाऱ्याने व हलक्या स्वरूपाचा पाऊस झाल्याने खरीप पिकाला काही प्रमाणात जीवदान मिळाले. तर दुसरीकडे काढून ठेवलेला उडीद झाकून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडाली, ऊसाचे उभे पीक भुईसपाट झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
मोठ्या क्षेत्रावरील ऊस वादळी वाऱ्यामुळे भुईसपाट झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अद्याप कोणत्याच कारखान्याचा गळीत हंगाम सुरु नसल्याने पडलेल्या ऊसाला उंदीर लागून मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
मागील पंधरा दिवसापासून पावसाने ओढ दिली होती.अचानक आलेल्या पाऊसाने, ऊसाचे मोठे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जावून पंचनामा करुन त्यांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करावे. अशी मागणी पिडीत शेतकरी वर्ग करत आहे.
याची प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सहकार्य करावे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...


याची प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करावी. एक शेतकरी
उत्तर द्याहटवा