Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २२ ऑक्टोबर, २०२०
धुळे तालुक्यातील निमगुळ येथे झालेल्या घटनेचा जाहीर निषेध...!
दिग्विजयसिंग राजपुत (मो.9860679223)
धुळे तालुक्यातील निमगुळ गावातील एक दोन वर्षाची बालिकेच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा करा अशी मागणी श्री करणी सेना व मनविसे धुळे जिल्हा यांच्या कडून केली जात आहे धुळे तालुक्यातील निमगुळ येथे दोन वर्षीय बालिकेला निर्दयीपण विहीरीत फेकून अमानुष खुन करण्यात आलेला दिसून येत आहे या घटनेची चौकशी करून घटनेतील मारेकऱ्यांना कठोर शिक्षा केली पाहिजे अशी मागणी श्री करणी सेना व मनविसे धुळे जिल्हा यांच्या कडून केली जात आहे.
धुळे तालुक्यातील निमगुळ येथील रहीवासी प्रविण रामराव माळी झोपले असता रात्री १२ नंतर त्यांची दोन वर्षीय मुलगी अंथरुणावर दिसली नाही मग त्यांच्या कुठूंबानी आरडाओरड सुरु केली सदरील घटना ही वैमनस्यातून खुन झाला की नरबळी ? असे वेगवेगळे संशय व्यक्त केले जात आहे.
बालिकेच्या मृत्यूचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे या मागील गुड लकवर बाहेर यायला पाहिजे अशी मागणी श्री करणी सेना, मनविसे धुळे जिल्हा सह संपूर्ण जिल्हातून केली जात आहे या दुदैवी घटनेचा धडा लावण्यासाठी संपूर्ण पोलीस प्रशासन आरोपीच्या शोधासाठी कामाला लागले आहे.
सदरील प्रकरण कोणी दाबण्याचा प्रयत्न किवा काही राजकीय पुढारी लोकांनी मारेकऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला तर श्री करणी सेना व मनविसे धुळे जिल्हा तीव्र प्रकारचे आंदोलन छेदेल असा इशारा दिग्विजयसिंग राजपुत यांनी दिला या घटने मुळे संपूर्ण जिल्हा हादळला आहे निमगुळ येथील प्रविण माळी यांच्या दोन वर्षीय चिमुकलीचे मृत्यू देह गावापासून दोन कि.मी.अंतरावर असलेल्या विहीरीत तरंगतांना दिसून आले या मुळे जनतेच्या मनात एक प्रश्न निर्माण होत आहे
की दोन वर्षीय मुलगी रात्री बारानंतर दोन कि.मी अंतरावर असलेली विहीरी पर्यंत पोहचली कशी ? बालिकेला नेमका कोणत्या कारणामुळे जीव गमवावा लागला दोन वर्षीय मुलीच्या जीव घेणाऱ्या नरधर्मांना कठोर शिक्षा झाली पाहिजे कारण एका आईने स्वताच्या पोटात ९ महीने ९ दिवस वागून वयाच्या दुसऱ्या वर्षी तीच्या चिमुकलीचा जीव गेला तेव्हा काय वाटले असेल मुलगी ही घरात लक्ष्मी च्या रूपात येते ज्या नरधर्मांनी बालिकेचा जीव घेतला असेल त्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी श्री करणी सेना व मनविसे धुळे जिल्हा यांच्या कडून केली जात आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा