Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, १८ सप्टेंबर, २०२१

"सत्रासेन येथील नागरिकांनी केले श्रमदान"



सत्रासेन प्रतिनिधी: ता. चोपडा; नादुरुस्त रस्ते आणि अपघात नेहमीचंच समीकरण आहे.उखडलेल्या रस्त्यांमुळे अपघात होतो.नागरिकांचा नाहक बळी जातो.तरीही प्रशासक ढिम्म असतं आता तर पावसाळा संपायला आला आहे.

रस्त्यात अनेक ठिकाणी खड्डे आहेत.
पावसाचं पाणी खड्ड्यात साचून दिवसेंदिवस अपघातांमध्ये वाढ होणार आहे.त्यामुळे रस्त्यांची डागबुजी करून खड्डे बुजवून रस्त्याचं नूतनीकरण करुण करावं, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.मात्र सत्रासेन येथे एक वेगळंच चित्र पाहायला मिळालंय.

(सत्रासेन नागरिकांकडून श्रमदान)

सत्रासेन येथील नागरिक गावातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यास सरसावले.पावसात रस्त्यावर खड्डे पडल्याने अपघाताच्या घटना घडतात.शिवाय पदाचाऱ्यांनाही याचा त्रास होतो.त्यामुळे केवळ प्रशासनाची वाट न पाहता,काही नागरिक स्वतः हातात कुदळ, फावडे घेत गावाबाहेरील खड्डे बुजवण्यास सुरुवात केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध