Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २८ सप्टेंबर, २०२१

धुळे,साक्री तालुक्यातील पंचायत समिती पोटनिवडणूक स्पेशल धाडणे गणातून भाजपला मिळाला नाही उमेदवार..! अधिकृत उमेदवाराच्या माघारीनंतर भाजप निवडणुकीतून बाहेर..!



साक्री पंचायत समितीच्या धाडणे सह ८ गणातील सदस्यांचे ओबीसी आरक्षणाच्या पेचामुळे सदस्यत्व रद्द झाले होते. त्या जागांवर येत्या ५ ऑक्‍टोबरला फेर निवडणूक होत आहे.नव्याने पोटनिवडणूक लागल्यानंतर धाडणे गणाच्या जागेसाठी एबी फॉर्म वाटपाबाबतचा भाजपच्या तालुक्यातील नेत्यांचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला होता.धाडणे गणाच्या फेर निवडणुकीत भाजपला उमेदवारच नसल्याने निवडणुकीतून दूर राहण्याची नामुष्की ओढवली आहे.
 
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीतून सदस्यत्व प्राप्त झाल्यानंतर ओबीसी आरक्षणाच्या कचाट्यात सापडून ८ सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. त्यापूर्वी धाडणे गणातून भाजपच्या सौ रोहिणी अकलाडे बिनविरोध निवडून आल्या होत्या. फेर निवडणूक लागल्यानंतर त्या जागेवर भाजप कडून अधिकृत उमेदवारीचा एबी फॉर्म मिळविण्यासाठी रोहिणी अकलाडे व त्यांचे पती सुधीर अकलाडे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले होते. 

मात्र भाजपच्या स्थानिक नेत्यांनी सौ अकलाडे यांचे तिकीट 'कापून' शेणपूर येथील सौ निकिता आकाश काकुस्ते यांना अधिकृत उमेदवार घोषित केले. मात्र सौ. काकुस्ते यांनी अर्ज माघारीच्या दिवशी ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेतल्याने भाजप नेत्यांकडून पुन्हा सौ. रोहिणी अकलाडे यांना उमेदवारीसाठी गळ घालण्यात आली.मात्र एकदा तिकीट कापल्यानंतर निवडणुकीत गोची होणार असल्याचे दिसताच उमेदवारीची ऑफर देण्यात आली.आधी पार्टीने प्रदेश स्तरावरून पहिल्याच उमेदवाराला (रोहिणी अकलाडे यांना) तिकीट द्यावे असे सांगितले असताना देखील स्थानिक नेत्यांनी हट्टापायी त्यांच्या मर्जीतील उमेदवारासाठी आमचे तिकीट कापले म्हणून ऐन वेळेस उमेदवारी देऊ केल्यानंतर आम्ही नकार दिला असे सुधीर अकलाडे व रोहिणी अकलाडे यांनी सांगितले.
          
निकिता काकुस्ते यांनी ऐन वेळी माघार घेतल्यानंतर व रोहिणी अकलाडे यांनी उमेदवारी नाकारल्यामुळे धाडणे गणातून भाजपचा पत्ता कट झाला आहे. धाडणे गण असलेल्या मालपुर गटाचे लोकप्रतिनिधी जि. प. मध्ये सभापती पदावर आहेत. भाजपच्या विद्यमान खासदार देशात राज्य मंत्री असताना पार्टीला निवडणुकीसाठी उमेदवार न मिळणे ही एक अजब गोष्ट आहे. यामुळे तालुक्यातील भाजपच्या नेत्यांच्या कार्यशैलीवर तालुक्यातून उलट सुलट चर्चा सुरू आहे. दरम्यान धाडणे गणातून अश्विनी नितीन अहिरराव, ताईबाई कारभारी अहिरे, जनाबाई प्रकाश ठाकरे व मंगलाबाई विजय भामरे यांच्यात चौरंगी लढत रंगणार आहे.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध