Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, १२ डिसेंबर, २०२१

कमी पटसंख्येच्या असलेल्या सर्व माध्यमिक विद्यालय राज्य सरकार बंद करणार



राज्य सरकारने १० विद्यार्थ्यांपेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या सर्व शाळा बंद करण्याचा घाट पुन्हा एकदा घातला आहे. अशा शाळा बंद करून विद्यार्थ्यांना जवळच्या अन्य शाळांमध्ये जाण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था करण्यात येणार आहे.
अशा सुमारे ४७ शाळा बंद केल्या जाणार आहेत.
सरकारने अमरावती, पालघर, नंदुरबार,धुळे कोल्हापूर, अकोला, नाशिक, सिंधुदुर्ग, ठाणे, नगर जिल्ह्यातील शेकडो शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. या शाळांचे अन्य शाळेत समायोजन करताना विद्यार्थ्यांच्या वाहतुकीची व्यवस्था करणार असल्याचे शालेय शिक्षण विभागाने अध्यादेशाद्वारे स्पष्ट केले आहे.
शाळा बंद करण्यासाठीची किमान पटसंख्या दहा इतकी निश्चित केली आहे. या निर्णयामुळे अनेक विद्यार्थ्यांना सात ते आठ किलोमीटरचा प्रवास करावा लागणार आहे. परिणामी विद्यार्थी शाळाबाह्य होण्याची शक्यता आहे.

बंद करण्याची कारणे
- शाळांमध्ये १ ते ५ विद्यार्थी संख्या
- पाचवी ते आठवीचे वर्ग उपलब्ध नसणे
- नव्या शैक्षणिक धोरणानुसार 'क्लस्टर' निर्मितीच्या दृष्टीने पावले

शाळा बंद झाल्यास त्यातील विद्यार्थी शाळाबाह्य होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर 'शिक्षक मित्र' यांच्यामार्फत विद्यार्थ्यांचे शिक्षण त्याचठिकाणी सुरू ठेवण्यासारखी पावले उचलली जावीत. या शाळांमधील विद्यार्थी हे साधारणतः सहा ते दहा वर्षे वयोगटातील आहेत. लांबच्या पल्ल्याच्या शाळेत पालक विद्यार्थ्यांना पाठविणार की नाहीत, याबाबत शंका आहे. त्यामुळे शाळा बंद करण्याऐवजी राज्य सरकारने पर्यायी मार्ग शोधणे गरजेचे आहे.

- महेंद्र गणपुले, राज्य प्रवक्ता, मुख्याध्यापक महामंडळ

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध