Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ४ जानेवारी, २०२२
Home
/
Unlabelled
/
तेलंगणा राज्य चोवीस तास फुकट वीज देणे परवडते, परंतु महाराट्रात विकत घेऊनही वेळेवर मिळत नाही
तेलंगणा राज्य चोवीस तास फुकट वीज देणे परवडते, परंतु महाराट्रात विकत घेऊनही वेळेवर मिळत नाही
एकीकडे तेलंगणात आता शेतकऱ्यांना चोविस तास मोफत वीज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तर दुसरीकडे महाराष्ट्रात मात्र महावितरणकडुन संपुर्ण महाराष्ट्रातील शेतकर्यांची वीज कनेक्शन तोडले जात आहेत. एकाच देशातील दोन राज्यात ही विभिन्न परिस्थिती आहे. तेलंगणासारखी सुविधा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळु शकत नाही हे दुर्दैवी आहे. याच मुद्द्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्याच्या उर्जामंत्र्यावर निशाणा साधला आहे..
याबाबत बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे राज्य प्रवक्ते रणजित बागल म्हणाले की, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना शेतकर्यांची अवस्था समजली म्हणुन त्यांनी शेतकर्यांप्रती कृतज्ञता दाखवत मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला,आता महाराष्ट्राचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी शेतकर्यांच्या वीजप्रश्नी कृतघ्नतेचे दर्शन घडवु नये आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांचा आदर्श घ्यावा व अनुकरण करावे..
याबाबत पुढे बोलताना बागल म्हणाले की, महाराष्ट्रात सध्या महावितरणकडुन शेतकर्यांची प्रचंड पिळवणूक सुरू आहे.. एकीकडे महाराष्ट्रात वीजबिलाच्या नावाखाली वसुली सुरू आहे तर दुसरीकडे तेलंगणात मात्र मोफत वीज मिळते, "तेलंगणात शेतकरी राहतो तर महाराष्ट्रात काय दरोडेखोर राहतात काय..?" हा प्रश्न राज्यातील सामान्य शेतकर्यांच्या मनात आल्याशिवाय राहत नाही..
जोपर्यंत सरकार या जनभावनेचा आदर करून शेतकर्यांना या वीजबीलाच्या जोखडातून मुक्त करत नाही तोवर स्वाभिमानीचे नेते आदरणीय राजु शेट्टीसाहेबांच्या नेतृत्वात स्वाभिमानीचा महावितरणविरोधातील लढा हा सुरूच राहील व भविष्यात आणखी तीव्र होईल असे बागल यावेळेस बोलताना म्हणाले..
तरुन गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर : भुसावळ सुरत पॅसेंजर मध्ये अवघ्या एक महिन्याच्या बाळाला टाकून आई वडील अमळनेर स्थानकावर उतरून गेल्याची घटना ९ रोजी रात्री घडली. ...
-
साक्री तालुक्याचे प्रगतीशील शेतकरी श्री विशाल दिलीप खैरनार.में वाय.जी.मोरे सिड्स अँड पेस्टीसाईड चे संचालक यांच्या मौजे विठाई येथील शेतात कलश...
-
प्रेयसीला शेवटचा व्हिडीओ कॉल -बनावट नावाने लॉज मध्ये राहिला अमळनेर : गुजरात मधील अहमदाबाद मधील पोस्को चा गुन्हा दाखल असलेल्या एका आरो...
-
मोटरसायकल वर दूध वाहून नेणाऱ्या जानव्याच्या भाग्यश्रीचे अपघाती निधन अमळनेर : वडिलांच्या व्यवसायात हातभार लावून पित्यासाठी ‛भाग्यश्री’ ठर...
-
अमळनेर : तालुक्यातील जवखेडा येथे मंगळवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास वीज चमकल्याने घोड्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. सायंकाळी अ...
-
नंदुरबार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नंदुरबार येथून श्री जितेंद्र दामोदर पगारे (सर) नंदुरबार जिल्हा क्रीडा पुरस्कार सन २०२२-२३ पुरस्कार...
-
अमळनेर : आई वडील ऊस तोडायला गेल्याने आसऱ्यासाठी ज्याच्याकडे ठेवले त्या चुलत मामानेच परित्यक्ता भाचीला तिच्या मुलीला मारण्याची धमकी देत...
-
अमळनेर:- अक्कलपाडा धरणातून पिण्यासाठी पाझरा नदीत आवर्तन सोडण्याची मागणी परिसरातील सरपंच उपसरपंच व लोकप्रतिनिधी यांनी केली आहे . यावर्षी ...
-
पारोळ्याच्या फटाका फॅक्टरीच्या तिघा मालकांना दहा वर्षांचा कारावास १६ वर्षांपूर्वी आगीत २१ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अमळनेर सत्...
-
सद्या राज्यात रासायनिक खतांच्या बेसुमार वापराने जमिनींची प्रत बिघडत चालली आहे. सेंद्रिय खतांचा वापर त्यासाठी वाढवताना पोशिंदाचा ऑरगॅनिक खताच...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा