Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, १ जानेवारी, २०२२

सुरत-भुसावळ पँसेजर पुर्ववत वेळेत व पुर्वीच्या भाडेत सलग धावणार.... दोंडाईचा स्थानकावर लवकरच बोगी इंडीकेटर बसणार- रेल्वे सल्लागार समिती सदस्य प्रविण महाजन यांची माहिती....



दोंडाईचा-  मुंबई येथे दिनांक ३० डिसेंबर रोजी पश्चिम रेल्वे सल्लागार समितीची बैठक पश्चिम रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक जी.व्ही.एल.सत्यकुमार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यात त्यांनी सुरत-भुसावळ पँसेजंर पुर्ववत वेळेत व पुर्वीच्या भाडेत सुरू होणार असल्याची माहिती रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य श्री प्रवीण महाजन यांनी आज दोंडाईचा येथे दिली.
मुंबई सेंट्रल येथील मुख्य कार्यालयात झालेल्या बैठकीत रेल्वे सल्लागार समितीचे मुंबईचे प्रतिनिधी शैलैश गोयल, राजीव सिंघल, राजीव जैन, मन्सूर उमर दुर्वेश, एम.बी.दवे, जाँय कोठारी वापी, संजय शाह नवसारी तसेच ताप्ती लाइनचे प्रतिनिधी प्रविण महाजन दोंडाईचा आदी मान्यवर व सर्व वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.
 बैठकीत श्री प्रविण महाजन यांनी मागणी वजा कैफीयत मांडली की, भुसावळ - बांद्रा १९०१३/१९०१४ खान्देश एक्स्प्रेस हि गाडी प्रवाशांच्या उदंड प्रतिसादामुळे दररोज करण्यात यावी. तसेच सदर गाडीच्या वेळेत बदल मुंबईहुन रात्री १० वाजता व भुसावळहुन रात्री ९ वाजता करण्यात यावा. तसेच गुजरातची औद्योगिक राजधानी असलेल्या वापी रेल्वे स्थानकांवर थांबा देण्यात यावा, अशी मागणी केली. सदर मागणीचे उत्तर देतांना रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, सदर गाडीसाठी सध्या फक्त एकच रँक उपलब्ध असल्याने दररोज करता येणार नाही. परंतु रेल्वे बोर्डाकडे सदर मागणी माडंली असुन लवकरच रँक उपलब्ध झाल्यावर सदर गाडी दररोज करता येईल. तसेच रात्री बांद्रा टर्मिनस कडुन मोठ्या प्रमाणावर नियमित गाड्या सोडण्यात येतात. म्हणुन ट्रँक खाली नसल्यामुळे वेळेत बदल सध्यातरी करता येणार नाही व वापी येथे लवकरच थांबा देण्यात येईल असे सांगितले.
तसेच पुणे रेल्वे सुरु करण्यासंदर्भात प्रविण महाजन यांनी सांगितले की, संपूर्ण खान्देश परिसरातील प्रवाशांची मोठी सोय होईल. सदर उधना-पुणे गाडीची घोषणा पश्चिम रेल्वेने केली होती. परंतु कोविडच्या प्रादुर्भाव वाढत असतांनाच सदर घोषणा मागे पडली. परंतु सदर गाडी उधनाऐवजी नंदुरबारहुन जळगांव ,मनमाडमार्गे सोडण्यात यावी किंवा भुसावळहुन सुटणारी खान्देश एक्स्प्रेस वसईहुन कल्याणमार्गे पुणे पावेतो करण्यात यावी जेणेकरुन मुंबईचे प्रवाशी बोरीवली ऐवजी वसईहुन पुढे उपनगरीय लोकलने जातील व पुण्याच्या प्रवाशांची देखील मोठी सोय होईल असे सांगितले .
 तसेच कोविडच्या प्रादुर्भाव बघता सुरत-भुसावळ ही पँसेजर दोन टप्यात करण्यात आली परंतु त्यामुळे प्रवाशांना नंदुरबार येथे उतरुन पुढील गाडीची प्रतिक्षा करावी लागते. तसेच वृद्ध ,महिला व लहान बालकांना त्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. यावर डि.आर.एम.सत्यकुमार साहेब यांनी अधिका-यांना धारेवर धरत सदर पँसेजर ह्या थेट भुसावळ ते सुरत करण्यात यावा असे सांगितले. त्याचप्रमाणे उधना-पाळधी मेमु गाडीसुद्धा प्रवाशांच्या सोयीसाठी किमान  जळगांव पावेतो करण्यात यावी. सदर मागणी मध्य रेल्वेच्या अधिका-यांशी चर्चा करुन जळगांव पावेतो करण्यात येईल असे सांगितले.दोंडाईचा रेल्वे स्थानकांवर प्रवाशांच्या सोईसाठी सिओपी शेड, पिण्याचे पाणी, शौचालय, बोगी इंडीकेटर बसवीण्याची मागणी करण्यात आली होती. यावर अधिका-यांनी त्वरीत बोगी इंडीकेटर मार्च २०२२च्या अगोदर बसवीण्यात येतील तसेच सिओपी शेड व पिण्याच्या पाण्याची सोय फ्लँट क्रमांक १ वर पुरेसे असुन फ्लँट २ व ३ वर त्वरीत बसवीण्यात येतील असे सांगितले.
कोविडच्या काळात विशेष रेल्वेगाड्यांना मर्यादीत व आरक्षीत प्रवाश्यांनाच प्रवेश असल्यामुळे तिकीटांचे मुल्य वाढविण्यात आले होते ते कमी करण्यात यावे तसेच दिव्यांग ,जेष्ठ नागरीक , विद्यार्थी यांच्या सवलती सुरु करण्यात याव्यात यावर अधिका-यांनी त्वरीत रेल्वे बोर्डाकडुन सदरचे आदेश पारीत होणार असुन भाडेवाढ कमी करण्यात येऊन मागीलप्रमाणे सवलती सुरु होतील असे सांगितले.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध