Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २५ जानेवारी, २०२२
Home
/
Unlabelled
/
मालेगाव तालुक्यातील टोकडेचे मुख्याध्यापक सुनिल फरस यांना राज्य माहिती आयोगाकडून नोटीस...! सात दिवसात खुलासा न केल्यास शास्तीची कारवाई माहिती अधिकारातील सामाजिक कार्यकर्ते विठोबा द्यानद्यान यांच्या तक्रारीवरून करावी
मालेगाव तालुक्यातील टोकडेचे मुख्याध्यापक सुनिल फरस यांना राज्य माहिती आयोगाकडून नोटीस...! सात दिवसात खुलासा न केल्यास शास्तीची कारवाई माहिती अधिकारातील सामाजिक कार्यकर्ते विठोबा द्यानद्यान यांच्या तक्रारीवरून करावी
मालेगाव तालुक्यातील टोकडे येथील सत्यवती कौर विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनिल फरस यांनी तक्रार कर्त्याला मुदतीत माहिती दिली नाही.या
कारणास्तव माहितीचा अधिकार अधिनियम 2005 च्या कलम 20 (1) अन्वये शास्तीची कारवाई का करण्यात येऊ नये ? याचा लेखी खुलासा सात दिवसात राज्य माहिती आयोगाकडे सादर करण्याची नोटीस नाशिक जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना माहितीस्तव आणि संबंधित अधिकारी कर्मचार्यांना नाशिक राज्य माहिती आयुक्त समीर सहाय यांनी बजावली आहे.
अन्यथा शास्तीची कारवाई करण्याचा इशारा नोटीसच्या माध्यमातून देण्यात आला आहे. तक्रारदार माहिती अधिकार कार्यकर्ते विठोबा द्यानद्यान यांनी मुख्याध्यापक सुनिल फरस यांच्याकडे माहिती अर्ज दि.16 आॕक्टोबर 2020 ला दिला होता.यानंतर दि.17 नोव्हेंबर 2020 ला प्रथम अपील केल्यानंतर पारित निर्णयावर 22 फेब्रुवारी 2021 रोजी तक्रारदाराने राज्य माहिती आयोगाकडे अर्ज केला.तो तक्रार अर्ज दि.22 फेब्रुवारी 2021 नाशिक राज्य माहिती आयुक्त यांना प्राप्त झाला.त्या अनुषंगाने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व संबंधित अधिकारी कर्मचारी यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
तक्रारदार द्यानद्यान यांनी प्रथम आपली अपिलातील निर्णयानुसार अद्याप माहिती मिळाली नाही, म्हणून राज्य माहिती आयोगाकडे माहितीचा अधिकार अधिनियम 2005 च्या कलम 18 (1) मधील तरतुदीनुसार तक्रार अर्ज दाखल केला.या कागदपत्रांचे अवलोकन राज्य माहिती आयोगाने केले.यात अर्जदार यांनी तपशिलात नमुद केल्याप्रमाणे टोकडे येथील सत्यवती कौर विद्यालयातील शिक्षकांचे नौकरी साठी शिक्षणाधिकारी कार्यालयास सादर केलेला प्रस्ताव व देण्यात आलेली मान्यता याची माहिती मागितली होती.
या माहिती अर्जासंदर्भात प्रथम अपीलीय अधिकार्याकडे दाखल करण्यात आलेल्या प्रथम अपिलमध्ये प्रथम अपिलीय अधिकारी यांनी आदेश पारित करुन मागितलेली माहिती अपिलकर्त्याला सात दिवसात विनाशुल्क द्यावी म्हंटले.परंतु
यानंतरही मुख्याध्यापक सुनिल फरस यांनी प्रथम अपिलीय अधिकार्यांच्या आदेशानुसार अद्यापि माहिती दिलेली नाही.यासंदर्भात मुख्याध्यापकांनी पंधरा दिवसात आयोगाकडे खुलासा सादर न केल्यास त्यांचे काहीही म्हणणे नाही, असे गृहीत धरून शास्तीची कारवाई आदेश कायम करण्याचे नोटीस मध्ये म्हंटले आहे.
तरुण गर्जना वृत्तपसह
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नंदुरबार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नंदुरबार येथून श्री जितेंद्र दामोदर पगारे (सर) नंदुरबार जिल्हा क्रीडा पुरस्कार सन २०२२-२३ पुरस्कार...
-
पारोळ्याच्या फटाका फॅक्टरीच्या तिघा मालकांना दहा वर्षांचा कारावास १६ वर्षांपूर्वी आगीत २१ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अमळनेर सत्...
-
अमळनेर:- अक्कलपाडा धरणातून पिण्यासाठी पाझरा नदीत आवर्तन सोडण्याची मागणी परिसरातील सरपंच उपसरपंच व लोकप्रतिनिधी यांनी केली आहे . यावर्षी ...
-
अमळनेर : आई वडील ऊस तोडायला गेल्याने आसऱ्यासाठी ज्याच्याकडे ठेवले त्या चुलत मामानेच परित्यक्ता भाचीला तिच्या मुलीला मारण्याची धमकी देत...
-
शेवग्याचा मेव्हणा व खवशी च्या आरोपींना अटक अमळनेर प्रतिनिधी : धुळे जिल्हयातील फागणे येथील आपल्या शालकाची विम्याची रक्कम हडप करण्यासाठी शे...
-
मुदतीत बांधणाऱ्यांना वाढीव अनुदान द्या तालुका काँग्रेसचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन अमळनेर : तालुक्यातील अनेक शासकीय घरकुल लाभार्थ्यांन...
-
तरूण गर्जना रिपोट :_ २९ मे ते २ जून सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीने बाहेर (खुल्या आकाशाखाली) जाऊ नये कारण हवामान विभाग...
-
प्रचिती इंटरनॅशनल स्कूल कावठे (साक्री) येथील तीन शिक्षकांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्र राज्य इंग्लिश मीडियम...
-
सद्या राज्यात रासायनिक खतांच्या बेसुमार वापराने जमिनींची प्रत बिघडत चालली आहे. सेंद्रिय खतांचा वापर त्यासाठी वाढवताना पोशिंदाचा ऑरगॅनिक खताच...
-
जानेवारीत १३ ग्रामपंचायतींचे आरक्षण निघाल्याने प्रक्रिया चुकली अमळनेर प्रतिनिधी : जानेवारी महिन्यात १३ ग्रामपंचायतींचे आरक्षण निघालेले होते ...
एकच् नंबर द्यानद्यानसाहेब
उत्तर द्याहटवाGood
उत्तर द्याहटवा