Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २० फेब्रुवारी, २०२२
मार्चमध्ये राज्यातील निर्बंध मोठ्या प्रमाणात कमी होणार !
त्यामुळे मार्चमध्ये राज्यातील निर्बंध मोठ्या प्रमाणात कमी करण्याचा राज्य शासनाचा विचार आहे असं ते म्हणाले.शिवाय केंद्र शासनाकडूनसुद्धा राज्याला निर्बंध कमी करण्यासंदर्भात पत्र आले आहे असं सांगताना टोपे म्हणाले,“ राज्यात कोरोनाची तिसरी लाट आल्यानंतर रोज ४८ हजारांपर्यंत कोरोना रुग्ण आढळून येत होते.
परंतु,आजघडीला रोज दोन हजारांपेक्षाही कमी रुग्ण राज्यात आढळून येत आहेत . शिवाय कोरोनामुळे होणारे मृत्यूही थांबले आहेत.राज्यात लसीकरणसुद्धा वेगाने झाले असून,आतापर्यंत ९ ३ टक्के टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे.पुढं टोपे म्हणाले,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कलदेखील निर्बंध कमी करण्याचा आहे; तसेच केंद्राकडूनही कोरोना रुग्ण संख्या कमी झाल्याने निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात पत्र आले आहे.
त्यामुळे मार्च महिन्यात परिस्थिती पाहून हॉटेल,विवाहा सोहळा,नाट्यगृह,सिनेमागृह आदी ठिकाणचे निर्बंध मोठ्या प्रमाणावर कमी करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे,असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा