Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
बुधवार, ३० मार्च, २०२२
केंद्र सरकारकडून आणखी 6 महिने मोफत धान्य मिळणार; मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली अलीकडेच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला (पीएम-जीकेएवाय) आणखी सहा महिने मुदतवाढ देण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. यामुळे देशातील 80 कोटी गरीब जनतेला या योजनेच्या माध्यमातून लाभ मिळणार आहे.
कोरोनाची लाट नियंत्रणात येत असली, तरी भारतात सर्व आर्थिक व्यवहार हळूहळू सुरू होत आहेत. यादरम्यान काही नागरिकांची परिस्थिती खालावली तर कोणाच्या हातातील काम गेल्याने हातात पैसा राहिला नाही. गरीब लोकांच्या नशिबी आणखी गरिबी आल्याने, आर्थिक व्यवस्था सुरळीत होण्याच्या काळात एकही गरीब कुटुंब उपाशी राहू नये म्हणून हा निर्णय घेतला आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना 31 मार्च रोजी संपणार होती, पण आता ही योजना 30 सप्टेंबरपर्यंत लागू राहील, असा निर्णय पंतप्रधान मोदी यांनी मंत्रिमंडळ बैठकीत घेतला. या योजनेच्या माध्यमातून रेशनकार्डवर गरिबांना प्रतिव्यक्ती महिन्याला एकूण 5 किलो मोफत धान्य मिळत आहे. त्यामध्ये या योजनेतील नागरिकांना तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ असे प्रति व्यक्ती दिले जाते.
कोरोना काळात गरीबांना आधार मिळावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्च 2020 मध्ये ही योजना सुरू केली होती. पण कोरोनानंतर देशात आर्थिक परिस्थिती मात्र बिघडली दिसत आहे. आता कोरोना पूर्णपणे नियंत्रणात असूनही गरीबांबरोबर संवेदनशीलता दाखवत या योजनेची मुदत वाढवली आहे, असे अन्नधान्य मंत्री पियुष गोयल यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान मोदी ट्विट करत म्हणाले, “देशातील सर्व नागरिकांच्या शक्तीत भारताचे सामर्थ्य आहे. हे सामर्थ्य आणखी वाढवण्यासाठी सरकारने ‘प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना’ (Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana) आणखी 6 महिन्यांनी वाढवली आहे. केंद्र सरकारची ही योजना चालू वर्षी सप्टेंबर 2022 पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशातील 80 कोटींहून अधिक जनतेला आधीसारखा लाभ आता घेता येईल”, असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करत माहीती दिली आहे
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर : सख्या अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य करणाऱ्या धुळे येथील एका विरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
-
साक्री नगरपंचायतीस मिळाली शववाहिनी; भाजपाचे सुरेश पाटील,सौं मंगला पाटील यांच्या हस्ते लोकार्पण सोहळासाक्री तालुका आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि धुळे जि.प.तर्फे साक्री नगरपंचायतीला वातानुकूलित शववाहिनी मिळाली असून, या सेवेमुळे नागरिकांना...
-
-
साक्री तालुक्यातील दहिवेल येथील पत्रकार संघाची कार्यकारणी महाराष्ट्राचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार...
-
चाळीसगाव तालुक्यातील पाथरजे येथील तलाठी श्रीमती मोमीन दिलशाद अब्दुल रहिम यांच्यावर लाच घेतल्याचा गंभीर आरोप ठेऊन धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभ...
-
पेण उपजिल्हा रुग्णालयात मॉड्युलर डिलिव्हरी रूम सज्ज पण आवश्यक गायनॅकॉलॉजिस्टची (स्त्रीरोग तज्ञ) यांची जागा मात्र रिक्तच...! "सामाजिक का...
-
शेतकऱ्यांच्या सातत्यपूर्ण मागणीला अखेर यश आले असून दहिवेल येथील कन्हैयालाल महाराज खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांकडून आकारले जाणा...
-
तहाडी (ता. शिरपूर) :तहाडी येथे ३१ जुलै २०२५ रोजी गावातील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी गावातील सामाजिक क...
-
खानदेशातील कानबाई रानबाई उत्सवाची परंपरा अनेक गावांमध्ये आज ही आहे काल शेणपूर येथे कानबाई मातेचा उत्सव मोठया जल्लोषात साजरा कारण्यात आला याम...
-
धुळे जिल्ह्यातील लळींग येथील अत्यंत महत्वाचे स्थळ असलेले लांडोर बंगला अर्थात पिकॉक हाऊस येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा