Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
बुधवार, २३ मार्च, २०२२
केंद्र सरकार ची वन नेशन वन रेशन योजना संपूर्ण देशात लवखरच लागू होण्याचे चिन्ह
केंद्र सरकारने गोरगरीब आणि मध्यम वर्गीय नागरिकांना दिलासा देणारी मोठी घोषणा केली असून यासाठी ९६.८ टक्के नागरिकांना फायदा होणार आहे. सरकारने संसदेत दिलेल्या माहितीनुसार रेशन कार्ड धारकांना आपले हककाचे रेशन घेण्या करिता नवीन घोषणे नुसार आता रेशन कार्ड सोबत ठेवण्याची आवश्यकता नाही याबाबत माहिती देताना अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री पियूष गोयल माहिती दिली की आता रेशन कार्ड धारकांना रेशन घेण्या करिता दुकांदारास रेशन कार्ड दाखविण्याची गरज नाही.आता पर्यंत रेशन दुकानातून धान्य घेताना सरकारी रेशन दुकानदारास रेशन कार्ड द्यावं लागतं होत.परंतु आता मात्र रेशन कार्ड धारकांस जिथे राहतात तिथे जवळच्या रेशन धान्य दुकानात रेशकार्ड नंबर आणि आधार नंबर सांगून सहज पने रेशन मिळू शकते.
मंत्री पियूष गोयल यांनी सांगितले की रेशकार्ड प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आलेली आहे देशात वन नेशन ,वन रेशन कार्ड ची सुविधा लागू करण्यात येत आहे.सरकारी आकडेवारी नुसार आता पर्यंत देशात वन नेशन ,वन रेशन कार्ड द्वारे ७७ कोटी लोकांना जोडण्यात आले आहे.यात रेशन कार्ड वापरणाऱ्यांची संख्या ९६.८ टक्के आहे.यात ३५ राज्य आणि केंद्र शासित प्रदेशातील लोकांना सामील करून घेतले आहे.
एखाद्या नागरीकाचे रेशकार्ड त्याच्या मूळ राज्यात असेल आणि नोकरी निमित्ताने ती व्यक्ती दुसऱ्या शहरात आपल्या कुटुंबासह राहत असेल तर त्याला त्याचा रेशकार्ड नंबर आणि आधार कार्ड नंबर देऊन कोणत्याही दुकानावर रेशन किंवा धान्य मिळू शकते.यासाठी रेशनकार्ड दाखविण्याची गरज नसल्याचे मंत्री गोयल यांनी सांगितले.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
साक्री तालुक्यातील दहिवेल येथील पत्रकार संघाची कार्यकारणी महाराष्ट्राचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार...
-
पेण उपजिल्हा रुग्णालयात मॉड्युलर डिलिव्हरी रूम सज्ज पण आवश्यक गायनॅकॉलॉजिस्टची (स्त्रीरोग तज्ञ) यांची जागा मात्र रिक्तच...! "सामाजिक का...
-
शिरपूर प्रतिनिधी : एका गंभीर आणि चिंताजनक घटनेत, पेसा कायद्यांतर्गत येणाऱ्या क्षेत्रातील स्थानिक नागरिक सध्या रामभरोसे सोडले गेल्याचे चित्र ...
-
धुळे जिल्ह्यातील लळींग येथील अत्यंत महत्वाचे स्थळ असलेले लांडोर बंगला अर्थात पिकॉक हाऊस येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ...
-
थाळनेर (वार्ताहर)शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया, ग्रामपंचायत व तेजस ऑनलाईन सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राम...
-
तहाडी (ता. शिरपूर) :तहाडी येथे ३१ जुलै २०२५ रोजी गावातील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी गावातील सामाजिक क...
-
शेतकऱ्यांच्या सातत्यपूर्ण मागणीला अखेर यश आले असून दहिवेल येथील कन्हैयालाल महाराज खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांकडून आकारले जाणा...
-
साक्री तालुक्यातील शेणपूर गावालगत असलेल्या आदिवासी वसाहतीत विज वितरण कंपनीने विदयुत पुरवठा करुन लाईन उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थांनच...
-
चिमठाणे गावातील चिमठाणे (पिप्रि )येथील सीताराम पाटील यांच्या सहकार्याने श्री क्षेत्र गांगेश्वर महादेव मंदिर हे तीर्थक्षेत्र असून सामाजिक कार...
-
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे गेल्या काही महिन्यांपासून विविध वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत होते. त्यातच विधानपरिषदेत ऑनलाईन रमी ख...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा