Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १३ मार्च, २०२२
रक्त,आणि विचारांच्या वंशजांमूळे आंबेडकर चळवळ दिशाहीन.:- डॉ.राजन माकणीकर
मुंबई दि (प्रतिनिधी) भक्त,रक्त आणि विचारांच्या वंशजांमुळे आंबेडकर चळवळ दिशाहीन झाली असून वेळेत योग्य निर्णय चळवळ वाचवणे गरजेचे असल्याचे मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ.राजन माकणीकर यांनी व्यक्त केले.
तिकिटा साठी व अन्य लाभ किंवा स्वार्थापोटी इतर पक्षाची गोटीगीरी करण्यापेक्षा आंबेडकरी पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मोठा करा आणि सत्तेत स्वतःचे अस्तित्व बनवा तसेच मनुवादाला गाडून टाका, यासाठी सर्व आंबेडकरी विचारांच्या लोकांनी रक्ताच्या वंशजांना एकत्र घेऊन चळवळ वाचवावि असे मतही पँथर डॉ.माकणीकर यांनी व्यक्त केले.
दिशाहीन झालेल्या चळवळीला अर्थपूर्ण करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे ऐक्य होणे गरजेचे असून देशातील सर्व राज्यात डॉ.बाबासाहेबांनी त्यांच्या हयातीत उभा केलेल्या उमेदवारांचे वंशज एकत्र करून पक्षाची पुनर्बांधणी करावी तसेच युवा नेतृत्वाला संधी देऊन वरिष्ठ नेत्यांनी फक्त सल्लागार व मार्गदर्शन कमिटी वर कार्यरत राहावे अशी इच्छा ही विद्रोही पत्रकार डॉ. राजन माकणीकर यांनी व्यक्त केली.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी - वरवाडे नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत शहरातील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. या निवडणुकीत युवा नेतृत्वाचा चे...
-
शिरपूर प्रतिनिधी –वरवाडे नगरपरिषद निवडणूक तापू लागली असून आज चिंतनभाई पटेल, भुपेशभाई आणि भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराने शहरात अक्षरशः जनला...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा