Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २४ मार्च, २०२२
Home
/
Unlabelled
/
नाशिक जिल्ह्यातील अंत्यत चुरशीची मानली जाणारी ताहराबाद ग्राम पंचाय प्रशासनाचा लाखो रुपयांचा गंडा उपोषण कार्यकर्त्यांनी केले वातावरण टाईट
नाशिक जिल्ह्यातील अंत्यत चुरशीची मानली जाणारी ताहराबाद ग्राम पंचाय प्रशासनाचा लाखो रुपयांचा गंडा उपोषण कार्यकर्त्यांनी केले वातावरण टाईट
नाशिक प्रतिनिधी: जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील ताहाराबाद ग्रामपंचायतीत गेल्या ४/५ महिन्यांपासून लखोरुपयांच्या भ्रष्टाचाराने वातावरण धगधगते असून ग्रामपंचायत कारभाऱ्यांचे अर्थात प्रशासनाचे धाबे दणाणले असून वातावरण टाईट झाले आहे म्हणून उपोषण करणारे सुभाष नंदन हे शिवसेनेचे बागलाण तालुका अध्यक्ष असूनही विरोधकांनी त्यांचेवर राईट केल्याने वातावरण अधिक गरम झाले आहे.
सद्या येथे ढगाळ वातावरण असल्याने उन्हाळ्यातील नैसर्गिक वातावरण काहीसे थंड असेल तरी ताहाराबाद गावातील ग्रामपंचायतीच्या वातावरणामुळे गावातील वातावरण तापलेले आहे.त्यामुळे थंड वातावरणात सुद्धा ग्रामपंचायत प्रशानास ” गरम झळा ” लागतात असे दिसते.लाखोंचा गंडा उघड होऊन सुद्धा हुशार प्रशासन भ्रष्टाचार करणाऱ्यांना का अभय देत आहे ? असा सवाल ग्रामस्थात चर्चिला जात आहे.
याबाबत समजलेली हकीकत अशी की,बागलाण तालुक्यातील ताहाराबाद येथील ग्रामपंचायतीत सात विकास कामांचे शासनाने ठरवून दिलेल्या नियमांची पायमल्ली करून लाखो रुपयांचा भ्ष्टाचार झाल्याचे पुरावे समोर उघडकिस होऊनही दोषींवर कारवाई करण्यास प्रशासन पुढे येत नसल्याने त्यांचेवर कारवाई करण्यात यावी दोषी ठरलेल्या अधिकारी,सरपंच आणि सत्ताधारी सदस्यांवर फौजदारी खटला दाखल करावा या मागणीसाठी शिवसेनेचे बागलाण तालुका अध्यक्ष सुभाष नंदन यांनी आमरण उपोषणाचे हत्यार २२ मार्च ०२२ पासून उपसले आहे.
सटाणा येथील पंचायती समोर आमरण उपोषणाला सुरुवात झाली असून परवा रात्री १२.०० वा.सुमारास विरोधकांनी नंदन व त्यांच्या सहकऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला सहकारी जखमी झाले असून नंदन मात्र बालंबाल बचावले आहेत.हा हल्ला सटाणा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी कोल्हे,विस्तार अधिकारी सूर्यवंशी आणि सावंत यांच्या समोर घडल्याचे बोलले जात असून चर्चेला वेगळेच उधाण आले आहे.
हल्ला करणाऱ्यांमध्ये सरपंच शीतल नंदन यांचे पती योगेश नंदन, भाऊसाहेब नांद्रे, प्रशांत सोनवणे, व अन्य जणांचा समावेश असल्याचे उपोषण कर्ते सुभाष नंदन यांनी महाराष्ट्र न्यूज शी बोलताना सांगितले. चौकशी अहवाल नुसार दोषींवर कारवाई करण्यात येऊन फौजदारी खटला भरण्यात येत नाही तो पर्यंत मी मागे हटणार नाही माझे आमरण उपोषण चालूच ठेवणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
विशेष म्हणजे ताहाराबाद ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा भ्ष्टाचाराविरुद्धच्या बातम्या सर्वत्र झळकत आहेत आणि टीव्ही वरती सुद्धा बातम्या दाखवले गेले आहेत तरीही आमचे काही झाले नाही असा निर्लज्ज टोला ग्रामविकास अधिकारी पवार यांनी खुद्द महाराष्ट्र न्यूज शी बोलताना ठेंगोडा येथील ग्रामपंचायतीत एका भेटी प्रसंगी लगावला होता.
भ्रष्टाचाराबाबत हा अधिकारी किती निगरगट्ट आणि पोसलेला आहे याची कल्पना त्याचे बोलण्यावरून येतेच अशा अधिकार्यांची नांगी प्रशासनाने वेळीच ठेचने गरजेचे असून त्यास पुन्हा ठेंगोडा ग्रामपंचायतीत कारभार पाहण्याची जबाबदारी दिल्याने त्या ग्रामपंचायतीत सुध्दा ” मलई ” मिळणार की नाही ? की मी नाही त्यातली….असे म्हणून जनतेवर रुबाबाचे आसूड ठेवणार असे पवार यांच्या बोलण्यावरून दिसले.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
साक्री तालुक्यातील दहिवेल येथील पत्रकार संघाची कार्यकारणी महाराष्ट्राचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार...
-
पेण उपजिल्हा रुग्णालयात मॉड्युलर डिलिव्हरी रूम सज्ज पण आवश्यक गायनॅकॉलॉजिस्टची (स्त्रीरोग तज्ञ) यांची जागा मात्र रिक्तच...! "सामाजिक का...
-
चाळीसगाव तालुक्यातील पाथरजे येथील तलाठी श्रीमती मोमीन दिलशाद अब्दुल रहिम यांच्यावर लाच घेतल्याचा गंभीर आरोप ठेऊन धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभ...
-
शेतकऱ्यांच्या सातत्यपूर्ण मागणीला अखेर यश आले असून दहिवेल येथील कन्हैयालाल महाराज खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांकडून आकारले जाणा...
-
तहाडी (ता. शिरपूर) :तहाडी येथे ३१ जुलै २०२५ रोजी गावातील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी गावातील सामाजिक क...
-
धुळे जिल्ह्यातील लळींग येथील अत्यंत महत्वाचे स्थळ असलेले लांडोर बंगला अर्थात पिकॉक हाऊस येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ...
-
खानदेशातील कानबाई रानबाई उत्सवाची परंपरा अनेक गावांमध्ये आज ही आहे काल शेणपूर येथे कानबाई मातेचा उत्सव मोठया जल्लोषात साजरा कारण्यात आला याम...
-
साक्री तालुक्यातील शेणपूर गावालगत असलेल्या आदिवासी वसाहतीत विज वितरण कंपनीने विदयुत पुरवठा करुन लाईन उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थांनच...
-
शिरपूर प्रतिनिधी : एका गंभीर आणि चिंताजनक घटनेत, पेसा कायद्यांतर्गत येणाऱ्या क्षेत्रातील स्थानिक नागरिक सध्या रामभरोसे सोडले गेल्याचे चित्र ...
-
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे गेल्या काही महिन्यांपासून विविध वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत होते. त्यातच विधानपरिषदेत ऑनलाईन रमी ख...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा