Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, १८ एप्रिल, २०२२

महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री.मा.ना.गुलाबरावजी पाटील साहेब(पाणी पुरवठा व स्वच्छता) समोर शिरपूर शहरातील वाढीव पाणीपट्टीचा मुद्दा मांडतांना तसेच अन्यायकारक दरवाढ रोखण्यासाठी शिवसेनेची आग्रही भूमिका




शिरपूर प्रतिनिधी -धुळे जिल्ह्यात महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री मा.नामदार गुलाबरावजी पाटील हे आज धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यानिमित्ताने त्यांनी आज धुळे जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर आढावा बैठक घेतली यावेळेस जिल्हाभरातून आलेल्या प्रतिनिधींनी आपल्या समस्या मंत्र्यांसमोर मांडून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचे विनंती केली.


सदरच्या बैठकीत शिरपूर शहर व तालुका शिवसेना पदाधिकारी यांच्याकडून शिरपूर शहरातील नगर परिषदेतर्फे लावण्यात आलेल्या अन्यायकारक पाणीपट्टीच्या विरोधात तक्रार करण्यात आली असून कोणतीही लोक मागणी व आवश्यकता नसताना शहरात जबरदस्तीने पाण्याचे मीटर बसवण्यात आले व त्या द्वारे 24 तास पाणीपुरवठा करण्याचे गाजर दाखवून दोन तास पाणीपुरवठा करून 24 तासाचे पाणीबिल आकारण्याच्या गोरखधंदा शिरपूर वरवाडे नगर परिषदेतर्फे शहरात सुरू आहे.

यामुळे शहरातील सामान्य नागरिक व जनता अतिशय त्रस्त झाले असून वर्षभरातील पाणीपट्टीच्या भार हा अनेकपटीने वाढल्याने सरासरी पंधराशे रुपयांच्या घरात असलेले पाणीपट्टी आज सर्वसामान्यांना आठ ते दहा हजारच्या घरात पोहोचले आहेत.शिवाय 24 तास ऐवजी दोन तास पाणीपुरवठा करणे,
पाण्याच्या मीटरमधील बिघाड ,गळती इत्यादी सर्व कराच्या भार हा नागरिकांवर पडत आहे.त्यामुळे वाढत्या महागाईला तोंड देत असताना सामान्य नागरिकांना पिण्याचे पाणी देखील आता अनमोल वाटू लागले आहेत.विशेष म्हणजे शिरपूर तालुक्यात मुबलक प्रमाणात नैसर्गिक पाणीसाठ्याचा स्त्रोत उपलब्ध असताना व कोणत्याही प्रकारची कृत्रिम पाणी टंचाई नसताना नगरपरिषद पाणी कराच्या नावाने नागरिकांवर अतिरिक्त भार लादत आहे.
 
त्यामुळे शिरपूर शहरातील अन्यायकारक पाणीची दरवाढ त्वरित थांबवण्यात यावी व मीटर पद्धत बंद करून पूर्वीप्रमाणे सरासरी पद्धतीने पाण्याचे बिल आकारण्यात यावे अशी मागणी पाणीपुरवठा मंत्र्यांकडे करण्यात आली त्यात यापूर्वी देखील शिवसेनेने वारंवार निवेदने देऊन पत्रव्यवहार करून नगरपरिषदकडे सदरची मागणी केली आहे.मात्र आजपर्यंत या मागणीकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही म्हणून शिरपूर शहरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर नगरपरिषदेतर्फे आर्थिक लूट होत आहे असा देखील आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे.

यावेळेस शिवसेनेकडून उपजिल्हा प्रमुख-भरतसिंग राजपूत,तालुका प्रमुख-अत्तरसिंग पावरा,शहरप्रमुख-मनोज धनगर,उपतालुका प्रमुख-अभय भदाणे,दिनेश गुरव उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध