Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ५ एप्रिल, २०२२
Home
/
Unlabelled
/
अचूक भविष्यवाणी करणारे गृहस्थ म्हणून किरीट सोमय्यांची महाराष्ट्रात नवी ओळख निर्माण होत आहे. - ना. जयंत पाटील
अचूक भविष्यवाणी करणारे गृहस्थ म्हणून किरीट सोमय्यांची महाराष्ट्रात नवी ओळख निर्माण होत आहे. - ना. जयंत पाटील
आज प्रसारमाध्यमांशी बोलताना जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांनी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याची टीका केली. शिवसेना खासदार संजय राऊत यांना जप्तीबद्दल आधी कल्पना द्यायला हवी होती. एकंदरीतच या सर्व प्रकरणातून संजय राऊत यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न होत आहे. दोन दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा ईडीच्या कारवायांबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यामुळे तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचे जगजाहीर आहे, असे जयंत पाटील म्हणाले.
किरीट सोमय्या जे काही वक्तव्य करतात त्या घटना आगामी दोन-चार दिवसांमध्ये घडतात. त्यामुळे अचूक भविष्यवाणी करणारे गृहस्थ म्हणून त्यांची महाराष्ट्रात नवी ओळख निर्माण होत आहे. केंद्रीय तपास यंत्रणा आपल्या कामाचा अहवाल नेहमी किरीट सोमय्यांना देत असतात असा एक आभास निर्माण झाला आहे, असे ते म्हणाले.
या कारवायांमुळे महाविकास आघाडी सरकारवर परिणाम होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. सरकार व सरकारशी संबंधित लोकांची बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे आणि त्यांच्याबद्दल संशय निर्माण करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर होत असल्याचे चित्र आहे, असे त्यांनी सांगितले.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिंदखेडा तालुक्यातील दहिवेल (ता. शिंदखेडा) येथे घडलेली एक घटना अपघात असल्याचे प्रथमदर्शनी भासवत असली, तरी नरडाणा पोलिसांनी तपासाचा धागा पकडत...
-
शिरपूर : शिरपूर पिपल्स को. ऑप. बँकेत १ कोटी ६६ लाख ५८ हजार ८५१ रुपयांचा अपहार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बँकेचा कनिष्ठ अधिकारी यो...
-
मुंबई: महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्याची व्याप्ती राज्यभर पसरल्याची कबुली शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आज विधान...
-
मानवाच्या ज्याप्रमाणे अन्न,वस्त्र व निवारा ह्या तीन मूलभूत गरजा आहेत,त्याचप्रमाणे शिक्षण सुद्धा चौथी मूलभूत गरज बनलेली असल्याने शेवटी जो शिक...
-
पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी) – औद्योगिक क्षेत्रातील दर्जेदार उत्पादन व ग्राहकविश्वासाच्या बळावर अल्पावधीत यशाची घोडदौड करणाऱ्या लु...
-
साक्री तालुका कृषी विभाग अंतर्गत खरीप पिक परियोजने अंतर्गत भुईमूग शेंगा बियाणे शंभर टक्के सबसिडीने शेतकऱ्यांना आज वाटप करण्यात आले साक्री ता...
-
नरडाणा पोलीस ठाण्याच्या कारवाईत वाहनांच्या बॅटऱ्या चोरी करणाऱ्या सराईत चोरट्यास अटक करून तब्बल २७ बॅटऱ्या आणि चोरीची अॅक्टीवा स्कुटी असा एक...
-
साक्री तालुका कृषी विभाग अंतर्गत खरीप पिक परियोजने अंतर्गत भुईमूग शेंगा बियाणे शंभर टक्के सबसिडीने शेतकऱ्यांना आज वाटप करण्यात आले साक्री ता...
-
बेटिवद प्रतिनिधी:- शिंदखेडा तालुक्यातील बेटावद गावात मागील दोन दिवसांपासून हलकासा रिमझिम पाऊस पडत होता.मात्र,आज शुक्रवार दि.२७ जून रोजी दुपा...
-
चोपडा:- जय रावण प्रतिष्ठान संघटनेच्या 6 व्या वर्धापदिनानिमित्त संघटनेचे अध्यक्ष अमोल संजय पारधी यांच्या संकलपनेतून गरजू शालेय विद्यार्थ्यांन...
भाजपा ने उघड सांगावे किरीट सोमय्या राणे विखे आत्वले शेलार फडणवीस चंद्रकांत पाटील चित्र वाघ हे ट्रेनर आहेत ed cbi चे
उत्तर द्याहटवा