Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २७ मे, २०२२
Home
/
Unlabelled
/
धुळे जिल्ह्यात खरीप हंगामात बियाणे आणि खतांचा काळाबाजार होऊन नाही कृषी विभागाने स्वतंत्र कक्ष सुरू तक्रारींची त्वरित दखल
धुळे जिल्ह्यात खरीप हंगामात बियाणे आणि खतांचा काळाबाजार होऊन नाही कृषी विभागाने स्वतंत्र कक्ष सुरू तक्रारींची त्वरित दखल
धुळे प्रतिनिधी:धुळे जिल्ह्यात खरीप हंगामात बियाणे आणि खतांचा काळाबाजार होऊन शेतकऱ्यांना फटका बसू नये यासाठी कृषी विभागाने स्वतंत्र कक्ष सुरू केला आहे.या कक्षात कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून तक्रारींची त्वरित दखल घेऊन कार्यवाही होणार आहे.
याद्वारे कृषी निविष्ठांच्या व्यवहारावर नियंत्रण,खरीप हंगामात बियाणे,खते व कीटकनाशकांबाबत शेतकरी कंपनी प्रतिनिधी,बियाणे,खते व कीटकनाशके विक्रेत्यांना क्षेत्रीयस्तरावर निर्माण होणाऱ्या अडचणींचे निराकरण व्हावे.तसेच बियाणे,खते व कीटकनाशकांचे उत्पादन,प्रक्रिया,वाहतूक,वितरण व विक्री करताना अडचणी निर्माण होऊ नये.निविष्ठांचा काळाबाजार व साठेबाजी रोखण्यासाठी उत्पादन,वितरण व विक्री नियंत्रित करणे आवश्यक आहे . यापार्श्वभूमीवर नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.हा कक्ष रोज सकाळी ८ ते सायंकाळी ८ या वेळेत सुरू राहील अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी दिली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा