Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १४ जुलै, २०२२

पावसाअभावी अरुणावती नदीचे पात्र कोरडे



पावसाअभावी अरुणवती नदीचे पात्र कोरडे

शिरपूर प्रतिनिधी: काही दिवसांपासून राज्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वच नद्यांना महापूर आलेला आहे.मात्र शिरपूर तालुक्यात अजुनही अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याने,तालुक्याची जीवनदायी समजली जाणाऱ्या अरुणावती नदीचे पात्र कोरडेठाक पडलेले आहे. 

गेल्या काही दिवसांपासून राज्यात वरूणराजा धो,धो बरसतोय.त्यामुळे केवळ नद्याच नाहीत तर नाल्यांनाही मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे . धुळे जिल्हयातही अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला असून पांझरेसह प्रमुख नद्यांना पूर आलेला आहे.मात्र तालुक्याची जीवनवाहिनी असलेली अरुणावती नदी अजुनही कोरडी ठाक पडलेली आहे.

नदीत पाण्याचे डबकेही साचलेले दिसून येत नाही.शिरपूर तालुक्यातील तापी नदीचा काठ सोडला तर तालुक्यातील बोराळी व थाळनेर मंडळांमध्ये अजुनही समाधानकारक पाऊस झालेला नाही.अरुणावती नदी काढवरील गावात विहिरीनी तळ गाठल्याचे दिसून येते आहे.

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध