Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २ डिसेंबर, २०२२
Home
/
Unlabelled
/
राज्यात लवकरच समान नागरी कायदा लागू होणार ? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संकेत
राज्यात लवकरच समान नागरी कायदा लागू होणार ? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संकेत
केंद्र सरकारकडून समान नागरी कायदा लागू करण्याची तयारी केली जातेय, काही राज्यं समान नागरी कायदा लागू करतायत.अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समान नागरी कायद्याबाबत महत्त्वाचं विधान केलंय.राज्यात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी योग्य वेळी विचार करु, असं विधान फडणवीसांनी केलंय,त्यामुळे राज्यात समान नागरी कायद्याबाबतच्या चर्चांना उधाण आलंय.
समान नागरी कायदाअस्तित्वात असलेलं सध्या देशात गोवा हे एकमेव राज्य आहे.आता उत्तराखंडमध्येही समान नागरी कायदा लागू होतोय.पण हा कायदा आल्यानं नेमकं काय होईल पाहुयात..
समान नागरी कायद्यामुळे काय होईल?
सध्या प्रत्येक धर्मासाठी विवाह, संपत्ती याबाबत स्वतंत्र कायदा
सर्व धर्मांना विवाह, घटस्फोट, मालमत्ता, दत्तक यासाठी एकच कायदा लागू होईल
आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही
विवाह आणि संपत्तीसाठी सर्वधर्मीयांसाठी एकच नियम
राज ठाकरे यांचा पाठिंबा
विशेष म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही समान नागरी कायद्याला जाहीर पाठिंबा दर्शवलाय.एका राज्यासाठी समान नागरी कायदा नसतो,ते केंद्र ठरवतं आणि तो संपूर्णपणे देशात येतो,आणि तो आला पाहिजे अशी आमची पहिल्यापासून मागणी असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
समान नागरी कायदा हा भाजप-संघाच्या अजेंड्यावर अनेक दशकं आहे.भाजपशासित राज्यात हा कायदा लागू करण्यासंबंधी हालचाली सुरु झाल्यात.त्याचवेळी केंद्राकडून सर्वच राज्यांसाठी हा कायदा आणला जाऊ शकतो.त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी –वरवाडे नगरपरिषद निवडणूक तापू लागली असून आज चिंतनभाई पटेल, भुपेशभाई आणि भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराने शहरात अक्षरशः जनला...
-
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर २० जिल्हा परिषद आणि २ महानगरपालिकांच्या आरक्षणाची सोडत पुन्हा काढणार ही प्रक्रिया पूर्ण करायला किमान १५ दिवस ल...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा