Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, ८ फेब्रुवारी, २०२३

उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे तारण हार महाराष्ट्र राज्य भाजप किसान मोर्चाचे उप प्रदेश अध्यक्ष बिंदु शेठ शर्मा नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळून देणार पीक विमा



नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सन 2022 मध्ये एक लाख 63 हजार 971 शेतकऱ्यांनी मका बाजरी सोयाबीन कांदा डाळिंब द्राक्ष व इतर पिकांवर विविध प्रकारचा पिकावर पीक विमा काढलेला आहे. गेल्यावर्षी जास्त पाऊस झाल्याने सतत हवामान बदलाने शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात मोठे नुकसान झाले आहे व उंबरठा पद्धतीने उत्पादन कमी झाले आहे त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना पीक विमा धारक सर्व शेतकरी विमा कंपनीने लाभार्थी ठरलेली आहेत पिक विमा कंपनीने शेतकऱ्यांना जि काही मदत केली आहे ती अत्यंत तुटपुंजी व कमी प्रमाणात आहे नुकसानीची रक्कम कोणत्या आधारावर दिली गेली आहे. ते शेतकऱ्यांना ते मान्य नाही नियमाप्रमाणे पीक विमा कंपन्याच्या निकषांवर शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीला ७२ तासाच्या आत कळवणे बंधनकारक आहे.परंतु तसे कळवूनही देखील कंपनीने हा विषय गांभीर्याने घेतलेला नाही.आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळालेली नाही त्यांना व्याज व दंडासह पीक विमा कंपनीला द्यावी लागेल विमा कंपन्याने जे शेतकऱ्यांनी विमा भरलेला आहे जे शेतकरी पात्र आहेत त्यांचा अंत पाहू नये अथवा शेतकऱ्यांचा उद्रेक झाल्यास पीक विमा कंपनी जबाबदार राहील. 24 तासाच्या आत पीक विमा मिळावा ही जाहीर मागणी भाजपचे किसान मोर्चा चे प्रदेश उपाध्यक्ष (महाराष्ट्र राज्य) चे बिंदू शेठ शर्मा यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी माननीय गंगाथरांडी यांना आपल्या निवेदनाद्वारे कळवले आहे. नासिक धुळे नंदुरबार सह अशा अनेक जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर प्रशासकीय यंत्रणेला धारेवर धरणारे नाव म्हणजे बिंदू शेठ शर्मा.यांनी आजवर अनेक लोक उपयोगी हिताची कामे आपल्या माध्यमातून प्रशासनाकडून करून घेतले आहेत याची अनेक उदाहरणे सांगता येतील त्यात मुख्यत्वे शेतकऱ्यांचा विजेची समस्या निकाली काढणे शेतकऱ्यांच्या बँक कर्जाची समस्यावर निराकरण करून तोडगा काढणे व अशा अनेक समस्यांना वाचा फोडण्याचे काम बिंदू शेठ शर्मा यांनी आतापर्यंत केलेले आहेत

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध