Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २१ मार्च, २०२३

बागलाण तालुक्यात भारतीय किसान मोर्चा चे उपप्रदेश अध्यक्ष बिंदू शेठ शर्मा यांनी थेट बांधावान जाऊन शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली



महाराष्ट्रातील सर्व राज्यासह उत्तर महाराष्ट्रात बागलाण तालुक्यात शेतकऱ्यांचा कांदा व डाळिंब याचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झाले आहे आज प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्याच्या झालेल्या नुकसानीचा पाहणी करत भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसान मोर्चा श्री बिंदू शेठ शर्मा यांनी बागलाण तालुक्यातील दराने शिवारात शेतकऱ्यांच्या शेतात भेट दिली असता अत्यंत विदारक परिस्थिती पहावयास मिळाली त्यांच्यासोबत सटाणा तालुक्याचे कृषी अधिकारी भोई साहेब तसेच तलाठी सर्कल यांच्या उपस्थितीत तात्काळ पंचनामा करून पंचनामाची प्रत ही राज्याचे कृषिमंत्री सत्तार साहेब तसेच नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री भुसे साहेब व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना माहिती कळून तात्काळ उपाययोजना करत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याचे आवाहन शेतकरी मित्र तसेच भाजप किसान मोर्चाचे उपप्रदेशाध्यक्ष बिंदू शेठ शर्मा यांनी शासनाला कळवले आहे तरी येणाऱ्या महिनाभरात शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा अहवाल सादर करून संबंधित शेतकऱ्यांना त्याचा योग्य मोबदला शासनाकडून दिला जाईल असे देखील आश्वासन यावेळी शेतकऱ्यांना श्री शर्मा यांनी केले

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध