Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १८ जून, २०२३
Home
/
Unlabelled
/
जाणून घ्या थोडी माहिती रासायनिक औषधे आणि रासायनिक खते बद्दल.त्या तुलनेत पी एम बायोटेक जैविक औषधे ठरतं आहेत शेतकऱ्यांसाठी वरदान व देत आहेत शेतकऱ्यांना अधिक उत्पादनाची हमी
जाणून घ्या थोडी माहिती रासायनिक औषधे आणि रासायनिक खते बद्दल.त्या तुलनेत पी एम बायोटेक जैविक औषधे ठरतं आहेत शेतकऱ्यांसाठी वरदान व देत आहेत शेतकऱ्यांना अधिक उत्पादनाची हमी
१)भारत देशात हरित क्रांतीचे छडयंत्र सांगून तसेच पिकांचे उत्पन्न दुपट साठी आणि अन्नधान्याची गरज भागविण्यासाठी संकरित वाण तयार केले गेले.१९६५ -१९६६ मध्ये ७८ हजार टन रासायनिक खत वापरले गेले.नंतर रासायनिक खते,फवारणी आणि संकरित वाण वापर सर्वात जास्त पटीने वाढू लागला. २००९-२०१०मध्ये २६५ टन रासायनिक खत वापरले गेले.उत्पन्न वाढीच्या मागे लागून शेतकरी मित्रांनी एक एकर साठी ८-१०पोते २०१३-२०१४ मध्ये वापरून उत्पन्न घट केले.शेतीवरील खर्च वाढविला.
२) मग शेतकरी मित्रांनी स्वतः जमिनी नापीक तसेच बंजर केले.शेतातील शत्रू कीटक नियंत्रणासाठी मित्र कीटक मारले गेले.कडूनिब ,बोरी,सूबाभुळ, गोदन,बोरू,द्येंचा, ताग,तसेच गावरान गाय, देशी आरोग्यपूर्वक भाजीपाला बियाणे समाप्त केले.आणि त्यामुळे आज लहान मुलांन पासून ते वृद्ध लोकांन पर्यंत सर्व आजार पसरत गेले.युरियाची मात्रा जमिनीमध्ये वाढल्याने शेतातील मोफत मध्ये काम करणारे गांडूळ मारले गेले.
३)कंपनी वाले,जाहिरात वाले,मार्केटिंग वाले यांनी सल्ले दिले की रासायनिक वापर करा.उत्पन्न वाढेल.रासायनिक महागडी औषध वापर करा कीटक नियंत्रण होतील.असे सांगितले गेले.त्यामुळे मित्र कीटक मारले गेले.जमीन मधील सेंद्रिय कर्ब गायब झाल्याने पालापाचोळा सडने ,कुजने बंद झाले. हूमनी,उदळीचे,कटवर्म,कोष चे प्रमाण वाढतच गेले.पिकांचे नुकसान वाढतच गेले.शेतकरी नेहमी रासायनिक खते आणि औषधे घेऊन मारला गेला .
४)जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र कु-हा, अमरावती.९५२९६००१६१.जैविक शेती विषयक संपूर्ण पीक माहिती,नियोजन,पिकांचे मुख्य सूत्रे,गांडूळ खत,मधमाशी पालन,जिवाणू खते प्रशिक्षण मोफत दिले जाणार.
५) शेतकरी मित्रांनी एकच एक सतत आणि नेहमी रासायनिक खते आणि रासायनिक औषधे फवारणी केल्याने रिझल्ट मिळत नाही आहे.पिके सर्व नपुसंक होत असल्याने उत्पन्न घट होवून नुकसान जास्त होत आहे.स्वतच्या हाताने कृषिप्रधान देशातील शेतकरी वर्गाने जमिनीवरील खर्च वाढविला.उत्पन्न घट केले.त्यामुळे आज सर्व शेतकरी मित्र आत्महत्या करत आहे.
६)हरियाणा पंजाब उत्तर प्रदेश या राज्यांत सर्वात जास्त म्हणजेच ४०-५०% अधिक प्रमाणात युरियाचा वापर होत आहे.त्यामुळे ह्याचे सर्व परिणाम मानवी आरोग्यावर दिसत असल्याने शासकीय तसेच खासगी दवाखाने रुग्णाने भरलेले आहे.त्यामुळे दवाख्यानील खर्च आणि औषधी वरील खर्च हा पुरेणासा झाला आहे.
७) शेतातील मित्र कीटक,पक्षी ,काजवा, यासारखे असंख्य मित्र कीटक आणि पक्षी मारले गेले.मानवाने स्वतच्या स्वार्थ साध्य करण्यासाठी टॉवर्स,बिल्डिंग,कंपनी , मॉल्स,इंडस्ट्रिअल क्षेत्र स्थापन केले.आणि भू - तलाववरील असंख्य जिवाणू, पक्षी,मित्र कीटक मारले.तसेच जमिनीतील पाणी स्तर ,जमिनीमधील सेंद्रिय कर्ब, गांडूळ,जिवाणू,सुपीक माती,काळीशार जमीन नापीक बनवली
८) त्यामुळे माझ्या देशातील सर्व कृषीप्रधान शेतकरी मित्रांनी रासायनिक बंद करून जैविक शेतीचा वापर करावा.जैविक शेतीला जास्त भर द्यावा."'नाहीतर मग चालू द्या
आण रासायनिक मार फवारणी.
उत्पन्न फक्त कंपनीचे.फायदा फक्त कंपनीचा.करोडोचा धंदा मात्र मार्केटिंग वाले.जाहिरात वाले चा."शेतकरी मित्रहो पटलंय न मग समजून घ्या नाहीतर रासायनिक खते तसेच औषधे वापरून शकुन घ्या.आणि पूर्ण आयुष्य बरबाद करत चला
९) शेतकरी मित्रांना स्वतः हवामान विषयक महिती हातात घेतले.जेव्हा वेळ मिळणार तेव्हा कधीही पेरणी केली.लागवड केली.तसेच कंपनी ची औषधे चालविणारे आता हवामान तज्ञ तयार झाले.चुकीचे सल्ले सांगत आहे.त्यामुळे शेतकरी भीतीने जास्तीत जास्त फवारणी करत आहे.
१०) शेतकरी मित्रांनी सर्वात जास्त तैलबिया वर्गीय पिके, घरगुती मसाला पिके शेतात लावा.स्वतः विक्री करा.शेतकरी मित्रांना नवीन वाटचाल द्या.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा