Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १७ सप्टेंबर, २०२४
अमळनेर समृद्ध करायचं असेल तर सर्वाना एक व्हावं लागेल-मंत्री अनिल पाटील
शिवाजी नगरात मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचे अर्ज वाटप,युवा राजे शिवाजी गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम
अमळनेर -आपलं शहर तथा आपलं गाव समृद्ध करायचं असेल तर आपल्या सर्वाना एक व्हावंच लागेल,जनतेचा आशीर्वाद राहिला तर आपल्या गावाचा व मतदारसंघाचा सुरू असलेला प्रगतीचा आलेख कुणीच थांबवू शकणार नाही,आणि कोणत्याही शासकीय योजनेपासूनही आपण वंचित राहणार नाही असा विश्वास मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी व्यक्त केला.
युवा राजे शिवाजी गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यान्नी अभिनव ऊपक्रम राबवून शिवाजी नगर परिसरातील जेष्ठ नागरिकांचे मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचे अर्ज भरून लाभार्थी महिला व पुरुषांना वाटप करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिक जे ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत, त्यांना भारतातील तीर्थश्रेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी 'मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना' सुरू करण्यात आली आहे. या योजनेतील पात्र व्यक्तींच्या प्रवासाचा, राहण्याचा व भोजनाचा खर्च शासना मार्फत करण्यात येणार असून जळगाव जिल्हयासाठी 1000 व्यक्तींना याचा लाभ देण्यात येणार आहे. या योजनेचे अर्ज ऑफलाईन पध्दतीने अमळनेर नगरपरिषदेच्या माध्यमातून शहरात विविध ठिकाणाहून भरून घेतले जात आहेत.शिवाजी नगर परिसरात सदर योजनेसाठी मोठा प्रतिसाद लाभून 55 जणांचे अर्ज भरून घेण्यात आले.
अर्ज वितरण प्रसंगी नगरपरिषदेच्या वतीने सोमचंद संदानशिव यांनी प्रास्तविक करत योजनेची सविस्तर माहिती दिली.तर मंत्री अनिल पाटील यांनी योजनेबाबत मार्गदर्शन केले,शहर व मतदारसंघात मंजूर व सुरू असलेल्या विकास कामांची माहिती त्यांनी दिली.नवीन 24 बाय 7 पाणीपुरवठा योजना मंजूर केल्याबद्दल उपस्थित नागरिकांनी मंत्री श्री पाटील यांचे कौतुक केले.सदर योजनेचे अर्ज भरून घेण्यासाठी विशेष परिश्रम घेणाऱ्या श्रीमती विमलताई ईच्छाराम पाटील यांचा सत्कार मंत्री पाटील यांनी केला.
यावेळी माजी नगरसेवक प्रताप शिंपी,शरद पाटील विनोद कदम,सोमचंद संदानशीव उपस्थित होते.सूत्रसंचालन व आभार अरुण पाटील यांनी मानले.दरम्यान सदर योजने अंतर्गत पहिल्या टप्प्यासाठी अर्ज करण्याची अंतीम मुदत दिनांक 18 सप्टेंबर, 2024 पर्यत वाढविण्यात आली आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमोद वाघ ईशान बडगुजर, निलेश सोनार ,गोलू कासार, मनोज मराठे, राहुल मराठे, गणेश कासार, शुभम वाघ ,ललित पाटील, कार्तिक पाटील, हर्षल मराठे व युवा राजे गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यानी परिश्रम घेतले.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर : चारचाकीने रिक्षाला धडक दिल्यावरून रिक्षाचालक जागीच ठार झाल्याची घटना २० रोजी सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास तालुक्यातील मंगरूळ ये...
-
धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई अमळनेर : दलित वस्ती सुधारणा रस्त्याच्या कामाच्या बिलाच्या मोबदल्यात १० टक्के कमिशन मागणाऱ्या पा...
-
शिरपूर प्रतिनिधी : शिरपूर कृषि उत्पन्न बाजार समिती येथून १९ मे २०२५ रोजी सकाळी ८ वाजता सर्वपक्षीय, सर्वधर्मीय, जिल्हास्तरीय तिरंगा यात्रा आय...
-
शिरपूर प्रतिनिधी : परिस्थिती सोबत संघर्ष करीत पत्रकार गणेश जैनांनी पाहिलेले स्वप्न त्यांची लेक तनिष्का जैन हिने दहावीच्या गुणवत्ता यादीत यत...
-
अमळनेर : तालुक्यातील जवखेडा येथे मंगळवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास वीज चमकल्याने घोड्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. सायंकाळी अ...
-
मोटरसायकल वर दूध वाहून नेणाऱ्या जानव्याच्या भाग्यश्रीचे अपघाती निधन अमळनेर : वडिलांच्या व्यवसायात हातभार लावून पित्यासाठी ‛भाग्यश्री’ ठर...
-
प्रेयसीला शेवटचा व्हिडीओ कॉल -बनावट नावाने लॉज मध्ये राहिला अमळनेर : गुजरात मधील अहमदाबाद मधील पोस्को चा गुन्हा दाखल असलेल्या एका आरो...
-
अमळनेर : भुसावळ सुरत पॅसेंजर मध्ये अवघ्या एक महिन्याच्या बाळाला टाकून आई वडील अमळनेर स्थानकावर उतरून गेल्याची घटना ९ रोजी रात्री घडली. ...
-
साक्री तालुक्याचे प्रगतीशील शेतकरी श्री विशाल दिलीप खैरनार.में वाय.जी.मोरे सिड्स अँड पेस्टीसाईड चे संचालक यांच्या मौजे विठाई येथील शेतात कलश...
-
बातमी छापली नाही म्हणून पत्रकारांवर होणारे हल्ले ही नित्याचीच बाब झाली असून सांगली जिल्ह्यात महिनाभरात दोन पत्रकारांवर हल्ले झाले असून या घट...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा