Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
सोमवार, १६ सप्टेंबर, २०२४
!! पत्र लेखन !! युगकर्त्यास पत्र. (देवाला पत्र )
विषय :- कलियुगात जनतेस होतं असलेल्या त्रास बद्धल.
श्री. देवाधिदेव राजे युगपुरुष देवा.
स. न. वि. वि.
हे प्रभुदेवा जीव निर्माण केला. त्या सोबत मानव प्राणी निर्माण केला. मानव प्राण्या मध्यें आम्ही येतो. सृष्टी कर्त्याने सर्व प्राण्यांचा विचार करून सृष्टी निर्माण केली. तुमच्याकडे युग निर्माण करण्याची जबाबदारी होती आणि आहे. आपण सर्व काळ आपल्या मना प्रमाणे निर्माण केलेत. अगदी सत्ययुग पासून आता कलियुग पर्यंत. कलियुगात लोकशाही चीं गोड्स नावानं सत्ता आमच्या वर लादलीस. विचार आणि संकल्पना लोकशाही चीं खुप छान आहे. पण त्या संकल्पनेस काळिमा फसणारे. राज्यकर्ते आमच्यावर बसवलेत." रोज खोटं बोला रेटून बोला " या प्रमाणे कली मध्ये जनतेला लुटणारे लुटारू सत्ता भोगी पुढे आलेत आणि येताय. जनतेचं रक्त पियुन तर्रर्र झालीत पुढारी, राज्यकर्ते. पैसा कुठं ठेवावा हे त्यांना समजतं नाही. इतकी लूट जनतेची हे करताय आम्ही मरतोय अन पुढारी टाळूवरचे लोणी खातोय असं झालंय.हे देवा कलियुगात लुटारू यांना माफ करतोय तु आम्ही काय पाप केलंय चांगलं वागून जगण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून आता तुला सांगणं आहे ह्या पापी सर्व जे असतील ते पुढारी यांची पाप घडा भर मग कोणी का असेना कोणत्या पण पार्टीचा असेना त्यांना गाड आणि जनतेच्या हिताचे निर्णय घेणारा जनतेतून प्रामाणिक. भ्रष्टाचार न करणारा पुढारी निर्माण कर आणि आमची या युगातून लवकर सुटका कर रे देवा.
"तळे राखेल तो फळ चाखेल " असं म्हणतात लबाड पुढारी."फोडा,तोडा,झोडा, सत्ते साठी साम,दाम, दंड वापर करताय सारी पुढारी. त्यात आम्ही भरडले जातोय.आम्हाला "भीक नको कष्टाचे दाम मिळु दे " गुण्यागोविदात आम्हाला जनतेला राहुदेत. आमच्यातून आमचा विचार करणारे. नितीवन्त लोकं सत्तेत बसूदे रे युगपुरुषा. लवकरात लवकर कली संम्पव आणि सत्ययुग सुरु करावं अशीच मागणी आहे आमची.इतकंच मागणं आहे प्रभुदेवा लवकर पूर्ण कराव्यात मागण्या. जनता कंटाळलीय या सर्वच दृष्ट पुढऱ्यांना. यांचा बंदोबस्त कर हिच अपेक्षा ठेवून पत्र संम्पवत आहे. लिहायला खुप आहे पण या पत्रा सोबत चार पाच पान जोडावी लागतील म्हणून थोडक्यात संपवतो अन थांबतो.©️®️
आपलीच जनता अन जनतेच्या विचारातून
प्रतिनिधी
प्रदीप पाटील
मु. पोस्ट गणपूर ता. चोपडा जिल्हा. जळगाव. पिन. 425108
मो. 9922239055©️®️
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर : चारचाकीने रिक्षाला धडक दिल्यावरून रिक्षाचालक जागीच ठार झाल्याची घटना २० रोजी सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास तालुक्यातील मंगरूळ ये...
-
धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई अमळनेर : दलित वस्ती सुधारणा रस्त्याच्या कामाच्या बिलाच्या मोबदल्यात १० टक्के कमिशन मागणाऱ्या पा...
-
शिरपूर प्रतिनिधी : शिरपूर कृषि उत्पन्न बाजार समिती येथून १९ मे २०२५ रोजी सकाळी ८ वाजता सर्वपक्षीय, सर्वधर्मीय, जिल्हास्तरीय तिरंगा यात्रा आय...
-
शिरपूर प्रतिनिधी : परिस्थिती सोबत संघर्ष करीत पत्रकार गणेश जैनांनी पाहिलेले स्वप्न त्यांची लेक तनिष्का जैन हिने दहावीच्या गुणवत्ता यादीत यत...
-
अमळनेर : तालुक्यातील जवखेडा येथे मंगळवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास वीज चमकल्याने घोड्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. सायंकाळी अ...
-
मोटरसायकल वर दूध वाहून नेणाऱ्या जानव्याच्या भाग्यश्रीचे अपघाती निधन अमळनेर : वडिलांच्या व्यवसायात हातभार लावून पित्यासाठी ‛भाग्यश्री’ ठर...
-
प्रेयसीला शेवटचा व्हिडीओ कॉल -बनावट नावाने लॉज मध्ये राहिला अमळनेर : गुजरात मधील अहमदाबाद मधील पोस्को चा गुन्हा दाखल असलेल्या एका आरो...
-
अमळनेर : भुसावळ सुरत पॅसेंजर मध्ये अवघ्या एक महिन्याच्या बाळाला टाकून आई वडील अमळनेर स्थानकावर उतरून गेल्याची घटना ९ रोजी रात्री घडली. ...
-
साक्री तालुक्याचे प्रगतीशील शेतकरी श्री विशाल दिलीप खैरनार.में वाय.जी.मोरे सिड्स अँड पेस्टीसाईड चे संचालक यांच्या मौजे विठाई येथील शेतात कलश...
-
बातमी छापली नाही म्हणून पत्रकारांवर होणारे हल्ले ही नित्याचीच बाब झाली असून सांगली जिल्ह्यात महिनाभरात दोन पत्रकारांवर हल्ले झाले असून या घट...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा