Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १३ सप्टेंबर, २०२४
आईने बाजाराला सोबत नेले नाही म्हणून मुलीने गळफास घेऊन केली आत्महत्या
अमळनेर (प्रतिनिधी) आईने बाजाराला सोबत नेले नाही म्हणून तालुक्यातील पिळोदे येथील १४ वर्षीय मुलीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना १२ रोजी घडली आहे. पोलिसांनी याबाबत दिलेली अधिक माहिती अशी की, पिळोदे येथील मालुबाई सुधाकर कोळी या बाजार करण्यासाठी अमळनेर जाणार होत्या. त्यावेळी त्यांची मुलगी माया सुधाकर कोळी (वय १४) ही सोबत येण्यासाठी हट्ट करत होती. मात्र मालुबाई यांनी तिला नकार दिल्याने माया हिने संतापात घराचा दरवाजा आतून लावून घेतला होता. मालूबाई ह्या बाजार करून आल्यानंतर माया हिने साडीच्या सहाय्याने लाकडी सऱ्याला गळफास घेतल्याचे दिसून आले. ग्रामस्थांच्या मदतीने तिला खाली उतरवून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मयत घोषित केले. याप्रकरणी अमळनेर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ गणेश पाटील हे करीत आहेत.
प्रतिनीधी
गणेश चव्हाण
अमळनेर जळगाव
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा